Sholay turns 50 : ‘शोले’ चित्रपटाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष! अमिताभ–धर्मेंद्र–हेमा–संजय यांची मैत्री सांगणारे ९ खास फोटो पहा

  59

शोलेच्या शूटिंगदरम्यानचा एक कॅन्डिड क्षण म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अमिताभ बच्चन यांनी काढलेल्या छायाचित्रासाठी दिलेली पोझ.



‘शोले’चे चित्रीकरण कर्नाटकमधील रामनगरच्या खडकाळ भागात झाले होते. या ठिकाणी धर्मेंद्र आणि अमिताभ यांचा एक शॉट देतानाचा क्षण टिपण्यात आला होता.



‘शोले’च्या सुरुवातीला दाखवलेल्या आयकॉनिक जेल सीनदरम्यान धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्यातला एक खास कॅन्डिड क्षण.



धर्मेंद्र आणि अमिताभ यांनी या चित्रपटात वीरू आणि जय ही पात्रं साकारली होती. त्यांची मैत्री इतकी दृढ दाखवण्यात आली की आजही बॉलिवूडमधील मैत्रीवर आधारित चित्रपटांसाठी तीच आदर्श मानली जाते.


या छायाचित्रात अमिताभ आणि धर्मेंद्र आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आयकॉनिक ‘ये दोस्ती’ या गाण्याच्या चित्रीकरणापूर्वी तयारी करताना दिसत आहेत.




गब्बर सिंहची भूमिका साकारणाऱ्या अमजद खानने, आपले कट्टर शत्रू ठाकूर बलदेवसिंह (संजय कुमार) यांच्यासोबत तसेच जय-वीरू (अमिताभ आणि धर्मेंद्र) यांच्यासोबत आनंदाने फोटोसाठी पोझ दिली आहे.



जया बच्चन यांनी ठाकूरांच्या सुनेची व विधवा असलेल्या राधाची भूमिका साकारली होती, ज्यांच्यावर चित्रपटात जयाचे मन जडते.



तब्बल ५० वर्षांपूर्वी झळकलेल्या 'शोले' या चित्रपटातील हे गाजलेले संवाद... 'कितने आदमी थे?', 'जो डर गया, समझो मर गया', 'ये हाथ हमको दे दे ठाकुर', 'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना', 'हम अंग्रेंजों के जमाने के जेलर है'...



भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवून आणणारा “शोले” आज ५० वर्षांचा झाला आहे. कथानक, व्यक्तिरेखा, संवाद आणि संगीत यामुळे काळाच्या पलिकडे जाऊन लोकप्रिय ठरलेल्या या सिनेमाच्या प्रवासाचा उत्सव आज संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जात आहे.

Comments
Add Comment

Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि

शमिता शेट्टीने केला राष्ट्रगीताचा अपमान? व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

मुंबई: आज संपूर्ण देशात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहेत. या खास प्रसंगी भारतात प्रत्येक ठिकाणी १५ ऑगस्ट

रहस्यमय ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भव्य-दिव्य सेटवर होणार चित्रीकरण

मुंबई: प्रत्येकालाच आयुष्यात एकदा तरी 'घबाड' मिळावं आणि रातोरात श्रीमंत व्हावं असं वाटतं. अशाच एका घबाडाच्या

गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

मुंबई : 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत

इंद्रायणी मालिकेत अंधश्रद्धेविरुद्ध शिक्षणाची लढाई!

मुंबई: लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी' मध्ये लवकरच एक मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त

आई तुळजाभवानी मालिकेत महादेवाकडून जगदंबेला योगविद्येचं ज्ञान!

मुंबई: लोकप्रिय मालिका "आई तुळजाभवानी" मध्ये लवकरच एक रोमांचक आणि आध्यात्मिक अध्याय सुरू होणार आहे. या विशेष