Rain update: महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास अतिमुसळधार, रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता, गरज असेल तरच घराबाहेर पडा

पुणे: गेली अनेक दिवस सुट्टीवर गेलेला पाऊस महाराष्ट्रात पुन्हा दाखल झाला आहे.  पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.  बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशात पावसाचा जोर वाढला आहे. ज्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात देखील पुढील ५ दिवस पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.



कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट 


मुंबई, ठाणे तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पालघरला पावसाचा येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.



पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस दाखल


राज्यात गेली कित्येक दिवस दडी करून बसलेला पाऊस पश्चिम महाराष्ट्राला देखील झोडपणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.



मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस


मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.



पुढील पाच दिवस अतिमुसळधार


विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये १८ आणि १९ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात