भारतीय सैन्यात अग्निवीरांची संख्या वाढणार

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली चांगली कामगिरी


नवी दिल्ली : केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली, तेव्हा त्याला जोरदार विरोध करण्यात आला. ही योजना तरुणांसोबत भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत विरोधकांनी ही योजना मागे घेण्याची मागणी केली. आमी, नौदल व हवाई दल अग्निपथ योजनेचा आढावा घेत असून सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या वाढवण्यात येणार आहे.


भारतीय लष्करामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सामील होण्यासाठी तसेच त्यांना लष्करात दाखल होण्याची संधी मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या तरुणांची निवड होते त्यांना अग्निवीर म्हटले जाते. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये ४ वर्षांसाठी भरती करण्यात येते. त्यांची ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम ठेवण्यात येते.


ऑपरेशन सिंदूर दरम्यान अग्निवीरांनी केलेली कामगिरी उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी २०२६ च्या अखेरीस तयार होणार आहे. इन्फट्री दलांमध्ये अग्निवीरांची संख्या ७० ते ७५ टक्के, हवाई संरक्षण, सिग्नल, अभियंते आदी ८० टक्के व स्पेशल फोर्सेसमध्ये अग्निवीरांची संख्या १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

IPhone 17 Series launch : फक्त काही तास! आयफोन १७ लाँच ईव्हेंटसाठी उत्सुकता शिगेला, १७ मध्ये बरंच काही नवीन... कुठे पाहाल लाईव्ह इव्हेंट? जाणून घ्या

मुंबई : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. २०२५ मधील सर्वात मोठा स्मार्टफोन लाँच ईव्हेंट उद्या, ९ सप्टेंबर

फेसबुक आणि यूट्युब बंदी विरोधात नेपाळची तरुण पिढी रस्त्यावर

काठमांडू : अफवा आणि खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात वेगाने पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जातो. हे कारण

देशद्रोही आणि नक्षलवादी पकडण्यासाठी NIA ची धडक कावाई, पाच राज्यांमध्ये धाडी

नवी दिल्ली : देशद्रोही आणि नक्षलवादी तसेच त्यांचे सहकारी पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने

Punjab News : रावी, सतलज आणि चिनाब नद्यांचं रौद्ररूप! ४ कोटी लोकांवर जीवघेणं संकट, ५६ जणांचा बळी...

अमृतसर : पाकिस्तानमधील रावी, सतलज आणि चिनाब या नद्यांना आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पगारात २०० टक्के वाढ

३० हजारांचा पगार थेट होणार ९० हजार लखनऊ (वृत्तसंस्था) : एक ऐतिहासिक निर्णय घेत, उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी

भटक्या कुत्र्यांची दहशत; महिलेवर जीवघेणा हल्ला, ज्येष्ठ नागरिकाला आणि चार मुलांना केले जखमी

बंगळुरू : कर्नाटकमधील होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तुमकुरु जिल्ह्यात गुब्बी