मिनी ट्रेन सेवेत वाढ करण्यात रेल्वे प्रशासन ढिम्म!

नेरळ-माथेरान फेऱ्या वाढवण्याची मागणी


माथेरान : देशविदेशातील पर्यटक नेहमीच माथेरानच्या मिनी ट्रेनची सफर मिळावी यासाठी हमखास इथे पर्यटक हजेरी लावतात. खासकरून नेरळ मार्गे माथेरान हा प्रवास घडावा ही त्यांची अपेक्षा असते. या मार्गावरून येताना निसर्गाचे मनमोहक नजारे आणि विविध पॉईंट्सचे दुरून दर्शन घडते. डोळे दिपवून टाकणाऱ्या उंच उंच खोल दऱ्या आणि वेडीवाकडी वळणे घेत जमिनीपासून जसजसे वर गाडीचा प्रवास सुरू असतो त्यावेळी आपण आकाश भ्रमंती करत असल्याचे भासते. त्यामुळे देशविदेशातील पर्यटक आवर्जून या ठिकाणी भेट देतात.


माथेरानमध्ये दरडी कोसळण्याची दाट शक्यता असल्याने रेल्वे प्रशासन दरवर्षी पावसाळ्यात चार महिने मिनी ट्रेन सेवा बंद करते. १५ ऑक्टोबर ते १५ जून या कालावधीत या ट्रेनची सुविधा उपलब्ध असते. परंतु केवळ दोनच ट्रेन या नेरळ माथेरान मार्गावर धावत असल्याने असंख्य पर्यटकांना मर्यादित तिकिटांमुळे या सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक निराश होतात. इंजिन उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करून अथवा स्टाफ नाही, बोग्यांची कमतरता अथवा तांत्रिक दुरुस्ती या प्रकारची कारणे सांगून अधिकारी वर्ग वेळ मारून नेत असल्याचे सांगितले जात आहे.


मुळात या अधिकारी वर्गाची पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून द्यावी याबाबत या ट्रेन बाबतीत मानसिकता नाही. यापूर्वीच्या काळात मिनी ट्रेनच्या पाच ते सहा फेऱ्या होत असत. यामध्ये मालवाहू गाडीतून जीवनावश्यक साहित्य असो किंवा बांधकाम साहित्य हे नियमितपणे यायचे. इथल्या शटल सेवेला डबल इंजिन लावून शटलची सुविधा पुरविली जायची. घाटातून केवळ एका इंजिनच्या सहाय्याने पाच ते सहा बोग्या भरून प्रवाशी येतात मग अमन लॉज ते माथेरान दरम्यान घाट सेक्शन नसताना शटलसाठी दोन इंजिनची आवश्यकता नाही. यातील काही इंजिन्स नेरळ माथेरान मार्गावर पर्यटकांच्या वाहतुकीसाठी ठेवल्यास असंख्य पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येईल. त्यासाठी अधिकारी वर्गाने पर्यटकांसाठी उन्हाळ्यातील आठ महिने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे.


पर्यटकांचे विशेष आकर्षण व जागतिक हेरिटेज दर्जा प्राप्त झालेल्या मिनी ट्रेनच्या नेरळ माथेरानच्या फेऱ्यामध्ये वाढ व्हावी ही काळाची गरज आहे. पूर्वी दिवसभरात पाच येण्यासाठी तर पाच जाण्यासाठी फेऱ्या होत असल्याने येणाऱ्या पर्यटकांना आनंद मिळत होता, तर येथील सर्वसामान्य नागरिकांना महिन्याभराचे जीवनावश्यक साहित्य आणणे व सुरक्षित प्रवास करणे अतिशय सुलभ होत होते. रेल्वे प्रशासनाने याचा पुनःश्चविचार करून या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि पर्यटक व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केली.

Comments
Add Comment

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले