Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड विधानांसाठी कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी कंगनाने पडद्यामागचं वास्तव समोर आणत असा खुलासा केला आहे, की तो ऐकून चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी येईल. अंगावर काटा आणणारा प्रसंग क्वीन कंगनाने सांगितला आहे. एका मुलाखतीत कंगनाने तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना सांगितलं की, तिच्या जन्माआधीच कुटुंबात एक मोठं दु:ख ओढवलं होतं. तिची ही कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.


कंगनाची आई पहिल्यांदा एका मुलाला जन्म देत होती. वडिलांनी त्याचं नाव प्रेमाने ‘हिरो’ ठेवलं. पण जन्मानंतर केवळ १० दिवसांतच त्या बाळाचं निधन झालं. "आजही आम्हाला त्याच्या मृत्यूचं खरं कारण माहीत नाही. कुटुंबातील काही लोकांचं म्हणणं होतं की नाळ खूप जास्त कापली गेली होती, त्यामुळे तो जास्त काळ जगू शकला नाही," असं कंगना म्हणाली. त्या घटनेनंतर तिच्या आईवर खूप खोल परिणाम झाला. "आईला मुलगा हवा होता. पण माझ्या जन्मावेळी, जेव्हा आजीने आईला सांगितलं की मुलगी झाली आहे, तेव्हा ती जोरात रडली. हे ऐकून मी हादरले होते," असं कंगना सांगते.




तिच्या जन्मानंतर वर्षभरातच तिचा धाकटा भाऊ झाला. पण त्यामुळे आई पूर्णपणे भावाकडे वळली आणि कंगनाला पणजीच्या खोलीत वाढवलं गेलं. “माझ्या आजी अनेकदा आईला टोमणे मारायच्या. आई दिवसभर रडत बसायची. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर आजीने ठरवलं की आता घरातील कुणीही प्रसूतीसाठी रुग्णालयात जाणार नाही. त्यामुळे आईने पुढची पाचही मुलं घरच्या एका खोलीतच जन्माला घातली," कंगनाने सांगितलं. कंगना पुढे सांगते की, तिच्या वडिलांचं मुलींविषयी विचारधाराचं चित्र वेगळं होतं."वडील मला नेहमी सांगायचे चांगलं शिक, म्हणजे तुझं लग्न चांगल्या मुलाशी होईल. जर अभ्यास केला नाही तर चांगला मुलगाही मिळणार नाही.


हिमाचलच्या लोकांबद्दल बोलताना कंगना म्हणाली, "इथले लोक मुलींविषयी संकुचित विचार करत नाहीत. उलट, प्रत्येकाला वाटतं की त्यांची मुलगी शिकावी, पुढं जावी आणि स्वतःच्या पायावर उभी राहावी."

Comments
Add Comment

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.

ग्रामीण मनोरंजनासाठी ‘किस्सा शुरू टॉकीज’!

ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी

Deepa Sawant-Khot : मर्डर मिस्ट्रीची ‘तलास’

कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढून त्या कलेची

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती

Pedii Box Office Collection : पेड्डीचा बॉक्स ऑफिसवर धडाका! 2 दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) यांचा बहुचर्चित 'पेड्डी' (Peddi) चित्रपट बॉक्स