Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड विधानांसाठी कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी कंगनाने पडद्यामागचं वास्तव समोर आणत असा खुलासा केला आहे, की तो ऐकून चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी येईल. अंगावर काटा आणणारा प्रसंग क्वीन कंगनाने सांगितला आहे. एका मुलाखतीत कंगनाने तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना सांगितलं की, तिच्या जन्माआधीच कुटुंबात एक मोठं दु:ख ओढवलं होतं. तिची ही कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.


कंगनाची आई पहिल्यांदा एका मुलाला जन्म देत होती. वडिलांनी त्याचं नाव प्रेमाने ‘हिरो’ ठेवलं. पण जन्मानंतर केवळ १० दिवसांतच त्या बाळाचं निधन झालं. "आजही आम्हाला त्याच्या मृत्यूचं खरं कारण माहीत नाही. कुटुंबातील काही लोकांचं म्हणणं होतं की नाळ खूप जास्त कापली गेली होती, त्यामुळे तो जास्त काळ जगू शकला नाही," असं कंगना म्हणाली. त्या घटनेनंतर तिच्या आईवर खूप खोल परिणाम झाला. "आईला मुलगा हवा होता. पण माझ्या जन्मावेळी, जेव्हा आजीने आईला सांगितलं की मुलगी झाली आहे, तेव्हा ती जोरात रडली. हे ऐकून मी हादरले होते," असं कंगना सांगते.




तिच्या जन्मानंतर वर्षभरातच तिचा धाकटा भाऊ झाला. पण त्यामुळे आई पूर्णपणे भावाकडे वळली आणि कंगनाला पणजीच्या खोलीत वाढवलं गेलं. “माझ्या आजी अनेकदा आईला टोमणे मारायच्या. आई दिवसभर रडत बसायची. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर आजीने ठरवलं की आता घरातील कुणीही प्रसूतीसाठी रुग्णालयात जाणार नाही. त्यामुळे आईने पुढची पाचही मुलं घरच्या एका खोलीतच जन्माला घातली," कंगनाने सांगितलं. कंगना पुढे सांगते की, तिच्या वडिलांचं मुलींविषयी विचारधाराचं चित्र वेगळं होतं."वडील मला नेहमी सांगायचे चांगलं शिक, म्हणजे तुझं लग्न चांगल्या मुलाशी होईल. जर अभ्यास केला नाही तर चांगला मुलगाही मिळणार नाही.


हिमाचलच्या लोकांबद्दल बोलताना कंगना म्हणाली, "इथले लोक मुलींविषयी संकुचित विचार करत नाहीत. उलट, प्रत्येकाला वाटतं की त्यांची मुलगी शिकावी, पुढं जावी आणि स्वतःच्या पायावर उभी राहावी."

Comments
Add Comment

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे