Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड विधानांसाठी कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी कंगनाने पडद्यामागचं वास्तव समोर आणत असा खुलासा केला आहे, की तो ऐकून चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी येईल. अंगावर काटा आणणारा प्रसंग क्वीन कंगनाने सांगितला आहे. एका मुलाखतीत कंगनाने तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना सांगितलं की, तिच्या जन्माआधीच कुटुंबात एक मोठं दु:ख ओढवलं होतं. तिची ही कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.


कंगनाची आई पहिल्यांदा एका मुलाला जन्म देत होती. वडिलांनी त्याचं नाव प्रेमाने ‘हिरो’ ठेवलं. पण जन्मानंतर केवळ १० दिवसांतच त्या बाळाचं निधन झालं. "आजही आम्हाला त्याच्या मृत्यूचं खरं कारण माहीत नाही. कुटुंबातील काही लोकांचं म्हणणं होतं की नाळ खूप जास्त कापली गेली होती, त्यामुळे तो जास्त काळ जगू शकला नाही," असं कंगना म्हणाली. त्या घटनेनंतर तिच्या आईवर खूप खोल परिणाम झाला. "आईला मुलगा हवा होता. पण माझ्या जन्मावेळी, जेव्हा आजीने आईला सांगितलं की मुलगी झाली आहे, तेव्हा ती जोरात रडली. हे ऐकून मी हादरले होते," असं कंगना सांगते.




तिच्या जन्मानंतर वर्षभरातच तिचा धाकटा भाऊ झाला. पण त्यामुळे आई पूर्णपणे भावाकडे वळली आणि कंगनाला पणजीच्या खोलीत वाढवलं गेलं. “माझ्या आजी अनेकदा आईला टोमणे मारायच्या. आई दिवसभर रडत बसायची. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर आजीने ठरवलं की आता घरातील कुणीही प्रसूतीसाठी रुग्णालयात जाणार नाही. त्यामुळे आईने पुढची पाचही मुलं घरच्या एका खोलीतच जन्माला घातली," कंगनाने सांगितलं. कंगना पुढे सांगते की, तिच्या वडिलांचं मुलींविषयी विचारधाराचं चित्र वेगळं होतं."वडील मला नेहमी सांगायचे चांगलं शिक, म्हणजे तुझं लग्न चांगल्या मुलाशी होईल. जर अभ्यास केला नाही तर चांगला मुलगाही मिळणार नाही.


हिमाचलच्या लोकांबद्दल बोलताना कंगना म्हणाली, "इथले लोक मुलींविषयी संकुचित विचार करत नाहीत. उलट, प्रत्येकाला वाटतं की त्यांची मुलगी शिकावी, पुढं जावी आणि स्वतःच्या पायावर उभी राहावी."

Comments
Add Comment

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित