Independence Day 2025: भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन, देशभरात उत्साह, पंतप्रधानांचे सलग १२व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण


नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७९ वर्षे झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ला ब्रिटीश शासनातून भारताला स्वांतंत्र्य मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्याच्या प्राचीर येथून सलग १२व्या वर्षी देशाला संबोधित करतील. सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर भाषणाला सुरूवात करतील. नरेंद्र मोदींच्या नावावर लाल किल्ल्यावरून सर्वात मोठे भाषण देण्याचा रेकॉर्ड आहे. २०२४मध्ये त्यांनी ९८ मिनिटांपर्यंत भाषण केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आपल्या भाषणादरम्यान, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि आपल्या कार्यकाळातील कल्याणकारी योजनांबाबत विस्ताराने सांगतील.


स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकूण ११ हजार सुरक्षारक्षक तसेच ३००० ट्रॅफिक पोलीस तैनात आहेत. उंच इमारतींवर स्नायपर्स ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.







पंतप्रधान मोदींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले की आजचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले स्वातंत्र्यवीर सेनानी यांनी दिलेले बलिदान आणि त्यांच्या कष्टामुळेच आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करतो. आपण केवळ इतिहासच लक्षात ठेवला नाही पाहिजे तर आपला देश एक विकसित आणि सशक्त राष्ट्र कसे बनेल याचाही विचार केला पाहिजे.


Comments
Add Comment

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक

BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर,

Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक

NEET-UG 2026 : पेपरफुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली, आता पुढे काय होणार ?

नवी दिल्ली : पेपरफुटी झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी रविवार ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली 'नीट' (NEET-UG

NEET UG 2026 : 'नीट' पेपर फुटीचं केरळ कनेक्शन! ४२ तास आधीच फुटला होता पेपर; परीक्षा अखेर रद्द; सीबीआय करणार चौकशी

२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक

Assam Himanta Biswa Sarma Oath : आसाममध्ये पुन्हा 'बिस्वा'राज! हिमंत बिस्वा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुवाहाटी : आसामच्या राजकीय इतिहासात मंगळवारी (१२ मे) एका नव्या पर्वाची नोंद झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता