Independence Day 2025: भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन, देशभरात उत्साह, पंतप्रधानांचे सलग १२व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण


नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७९ वर्षे झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ला ब्रिटीश शासनातून भारताला स्वांतंत्र्य मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्याच्या प्राचीर येथून सलग १२व्या वर्षी देशाला संबोधित करतील. सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर भाषणाला सुरूवात करतील. नरेंद्र मोदींच्या नावावर लाल किल्ल्यावरून सर्वात मोठे भाषण देण्याचा रेकॉर्ड आहे. २०२४मध्ये त्यांनी ९८ मिनिटांपर्यंत भाषण केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आपल्या भाषणादरम्यान, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि आपल्या कार्यकाळातील कल्याणकारी योजनांबाबत विस्ताराने सांगतील.


स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकूण ११ हजार सुरक्षारक्षक तसेच ३००० ट्रॅफिक पोलीस तैनात आहेत. उंच इमारतींवर स्नायपर्स ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.







पंतप्रधान मोदींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले की आजचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले स्वातंत्र्यवीर सेनानी यांनी दिलेले बलिदान आणि त्यांच्या कष्टामुळेच आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करतो. आपण केवळ इतिहासच लक्षात ठेवला नाही पाहिजे तर आपला देश एक विकसित आणि सशक्त राष्ट्र कसे बनेल याचाही विचार केला पाहिजे.


Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे