Independence Day 2025: भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन, देशभरात उत्साह, पंतप्रधानांचे सलग १२व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण


नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७९ वर्षे झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ला ब्रिटीश शासनातून भारताला स्वांतंत्र्य मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्याच्या प्राचीर येथून सलग १२व्या वर्षी देशाला संबोधित करतील. सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर भाषणाला सुरूवात करतील. नरेंद्र मोदींच्या नावावर लाल किल्ल्यावरून सर्वात मोठे भाषण देण्याचा रेकॉर्ड आहे. २०२४मध्ये त्यांनी ९८ मिनिटांपर्यंत भाषण केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आपल्या भाषणादरम्यान, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि आपल्या कार्यकाळातील कल्याणकारी योजनांबाबत विस्ताराने सांगतील.


स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकूण ११ हजार सुरक्षारक्षक तसेच ३००० ट्रॅफिक पोलीस तैनात आहेत. उंच इमारतींवर स्नायपर्स ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.







पंतप्रधान मोदींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले की आजचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले स्वातंत्र्यवीर सेनानी यांनी दिलेले बलिदान आणि त्यांच्या कष्टामुळेच आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करतो. आपण केवळ इतिहासच लक्षात ठेवला नाही पाहिजे तर आपला देश एक विकसित आणि सशक्त राष्ट्र कसे बनेल याचाही विचार केला पाहिजे.


Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट