Independence Day 2025: भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन, देशभरात उत्साह, पंतप्रधानांचे सलग १२व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण


नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७९ वर्षे झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ला ब्रिटीश शासनातून भारताला स्वांतंत्र्य मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्याच्या प्राचीर येथून सलग १२व्या वर्षी देशाला संबोधित करतील. सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर भाषणाला सुरूवात करतील. नरेंद्र मोदींच्या नावावर लाल किल्ल्यावरून सर्वात मोठे भाषण देण्याचा रेकॉर्ड आहे. २०२४मध्ये त्यांनी ९८ मिनिटांपर्यंत भाषण केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आपल्या भाषणादरम्यान, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि आपल्या कार्यकाळातील कल्याणकारी योजनांबाबत विस्ताराने सांगतील.


स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकूण ११ हजार सुरक्षारक्षक तसेच ३००० ट्रॅफिक पोलीस तैनात आहेत. उंच इमारतींवर स्नायपर्स ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.







पंतप्रधान मोदींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर लिहिले की आजचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले स्वातंत्र्यवीर सेनानी यांनी दिलेले बलिदान आणि त्यांच्या कष्टामुळेच आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करतो. आपण केवळ इतिहासच लक्षात ठेवला नाही पाहिजे तर आपला देश एक विकसित आणि सशक्त राष्ट्र कसे बनेल याचाही विचार केला पाहिजे.


Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी