Bengluru Blast: बेंगळुरूमध्ये स्फोट! १० वर्षीय मुलाचा मृत्यू , तर १२ जण जखमी

  28

बेंगळुरू: शुक्रवारी बेंगळुरूमधील विल्सन गार्डनच्या चिन्मयनपाल्य भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सदर घटना नेमकी १५ ऑगस्ट रोजी घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची खबर मिळताच, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विल्सन गार्डनमध्ये घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. स्फोटातील जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सिलिंडरच्या भीषण स्फोटात अनेक घरांचे नुकसान

सिलेंडर स्फोटाची ही घटना दाट लोकवस्ती असलेल्या निवासी भागात घडली, जिथे घरे एकमेकांना लागून होती. स्फोट इतका जोरदार होता की ८ ते १० घरांचे नुकसान झाले.  जेव्हा स्फोट झाला तेव्हा एकामागून एक सर्व घरांनी पेट घेतला आणि ही सर्व घरं पत्त्यासारखी कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात सिलेंडरमधून गॅस गळती हे स्फोटाचे कारण मानले जात आहे. स्फोटानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि बचाव पथके सतत काम करत आहेत. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर कोणताही अपघात होऊ नये म्हणून जवळपासची घरे रिकामी करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे आणि गॅस पुरवठ्याशी संबंधित सर्व पैलू तपासले जात आहेत.

Comments
Add Comment

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील

जम्मू-काश्मीर : किश्तवाड ढगफुटीतील मृतांचा आकडा 65 वर

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीत मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. त्यात दोन सीआयएसएफ

एसीच्या कूलिंगबद्दल केली तक्रार ! डक्ट पॅनल उघडल्यानंतर जे समोर आलं पाहून तुम्हीही व्हाल थक्क

पाटणा : लखनऊ- बरौनी एक्सप्रेसमधील प्रवाशांनी एसीच्या कूलिंगबद्दल तक्रार केली . या तक्रारीनंतर जेव्हा टेक्निशियन

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

रोजगार योजना, सुदर्शन चक्र मिशन, जीएसटी कपात, पहिली सेमीकंडक्टर चिप, ऊर्जा स्वयंपूर्णता आणि घुसखोरीच्या मुद्यावर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून १००

पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा