अलिबाग तालुक्यात स्मार्टमीटर बसविण्याला वेग

१५ हजारांहून अधिक मीटर बदलले


ग्राहकांना वीजबिलात घट होण्याची शक्यता


अलिबाग : विविध राजकीय पक्षांसह वीज ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे अलिबाग तालुक्यात स्मार्टमीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलिबाग- १ आणि अलिबाग- २ या विभागांमध्ये आतापर्यंत १५ हजारांहून अधिक ग्राहकांचे मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले गेले आहेत. हे मीटर पोस्टपेड असून, सध्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करू नये, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.


अलिबाग आणि पेण तालुक्यात २२ हजार वीज ग्राहकांकडून स्मार्ट मीटरचा वापर करण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र स्मार्ट विद्युत मीटरमुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला होता. कारण, हे प्रीपेड स्वरूपाचे असल्याने मोबाईलसारखे रिचार्ज करावे लागतील, तसेच वेळेत रिचार्ज न केल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीती होती. मात्र, त्यानंतरही अलिबागमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. सध्या बसविले जाणारे स्मार्ट मीटर पोस्टपेड आहेत, असे महावितरणच्या अलिबाग विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.


स्मार्ट मीटर ग्राहकांना कमी दर असताना आपला वीज वापर ऑफ-पीक तासांमध्ये आपल्या सोयीप्रमाणे समायोजित करण्याची परवानगी देतात. त्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात घट होण्याची शक्यता वाढते. तसेच स्मार्ट मीटर ग्राहकांना किमतीतील फरकांवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास क्षमता देतात. स्मार्ट मीटरमध्ये होम ऑटोमेशन अग्रणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ऊर्जा व्यवस्थापनाची क्षमता असते, ज्यामुळे ग्राहक आपल्या वीज बिलात बचत करू शकतात.


अलिबाग १ विभागात एकूण १० हजार २९१, तर अलिबाग २ विभागात ४ हजार २६१ ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत, तर पेण विभागातही ८ हजार ९६४ ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले आहेत. याप्रमाणे तीनही विभागांमध्ये एकूण २२ हजार ५१६ ग्राहकांना मीटर देण्यात आले. यात तीनही विभागांमध्ये एकूण ३ हजार ०५९ नवीन ग्राहकांचा समावेश आहे.


घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना विशेषतः ज्यांचा वीज वापर जास्त आहे अशांना वीज दरात कपात झाल्यास मोठा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी दिवसा विशिष्ट वेळेत वीज वापरल्यास सवलतही मिळते, जसे की दुपारी एक ते सायंकाळी पाचपर्यंत अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर किंवा सेवांवर सवलत देत असल्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत वस्तू मिळतात.


स्मार्ट मीटर ग्राहकांना किमतीतील फरकांवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतात, स्मार्ट मीटरमध्ये होम ऑटोमेशन आणि मोबाइल अॅपद्वारे ऊर्जा व्यवस्थापनाची क्षमता असते. म्हणून ग्राहकांनी स्मार्ट मीटरचा फायदा घेऊन आपल्या वीज बिलात
बचत करावी.
- ममता पांडे, (जनसंपर्क अधिकारी, महावितरण)

Comments
Add Comment

Raigad : दिघी खाडीत मच्छीमारांच्या बोटीला अपघात; फेरीबोटीने वाचवले तीन जीव

रायगड(Raigad) : जिल्ह्यातील दिघी खाडीत शनिवारी मासेमारीसाठी गेलेली एक छोटी बोट अचानक पाण्

Zenith Waterfall: खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर १०० हून अधिक पर्यटक अडकले; ३ तासांच्या बचाव मोहिमेनंतर सर्वांची सुखरूप सुटका

रायगड : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर (Zenith Waterfall) शनिवारी मोठी दुर्घटना टळली.

New Ropeway Project : माथेरान ते रायगड किल्ल्यासह पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

रायगड : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Ambenali Ghat : आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत वाहनांसाठी बंद

अलिबाग : आंबेनळी घाट हा भूस्खलन, दरड कोसळणे आणि दगड घसरण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून ही बाब लक्षात घेऊन

पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; सहप्रवाशांना जीवे मारण्याच्या धमक्या

पनवेल : पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम