गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज

खाद्य रंगांसह वर्तमानपत्रांचाही वापर न करण्याच्या व्यावसायिकांना सूचना


अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज झाले असून, सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची दक्षता जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी घ्यावी. तसेच अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही प्रकारची तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.


अन्न पदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये. मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या आनुषंगाने मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही या विभागाकडून देण्यात आल्या आहेत.


आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने, तसेच किटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक किंवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत. आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा, अन्न पदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ पॅकिंग करताना वर्तमानपत्राचा वापर करू नये.


बंगाली मिठाई ही २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. मिठाई बनविताना, तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अप्रन वापरावे. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचा व उच्च प्रतीचा असावा. मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे. अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असी आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Raigad : दिघी खाडीत मच्छीमारांच्या बोटीला अपघात; फेरीबोटीने वाचवले तीन जीव

रायगड(Raigad) : जिल्ह्यातील दिघी खाडीत शनिवारी मासेमारीसाठी गेलेली एक छोटी बोट अचानक पाण्

Zenith Waterfall: खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर १०० हून अधिक पर्यटक अडकले; ३ तासांच्या बचाव मोहिमेनंतर सर्वांची सुखरूप सुटका

रायगड : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर (Zenith Waterfall) शनिवारी मोठी दुर्घटना टळली.

New Ropeway Project : माथेरान ते रायगड किल्ल्यासह पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

रायगड : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Ambenali Ghat : आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत वाहनांसाठी बंद

अलिबाग : आंबेनळी घाट हा भूस्खलन, दरड कोसळणे आणि दगड घसरण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून ही बाब लक्षात घेऊन

पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; सहप्रवाशांना जीवे मारण्याच्या धमक्या

पनवेल : पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम