गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज

खाद्य रंगांसह वर्तमानपत्रांचाही वापर न करण्याच्या व्यावसायिकांना सूचना


अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासन सज्ज झाले असून, सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची दक्षता जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी घ्यावी. तसेच अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही प्रकारची तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.


अन्न पदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये. मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या आनुषंगाने मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही या विभागाकडून देण्यात आल्या आहेत.


आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने, तसेच किटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक किंवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत. आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा, अन्न पदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ पॅकिंग करताना वर्तमानपत्राचा वापर करू नये.


बंगाली मिठाई ही २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. मिठाई बनविताना, तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अप्रन वापरावे. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचा व उच्च प्रतीचा असावा. मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे. अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असी आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून