सीएम फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठे यश महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक होणार !

प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला आणखी एक यश प्राप्त झाले. महाराष्ट्र सरकारने कॅपिटललॅंड इन्व्हेसमेंट लिमिटेड (CLI) कंपनीशी यशस्वीपणे सामंजस्य करार (Memorandum of Understanding MoU) केला आहे. जागतिक दर्जाच्या या रिअल असेट मॅनेजमेंट कंपनीने महाराष्ट्रात या कराराअंतर्गत २०३० पर्यंत १९२०० कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याची घोषणा केली आहे. त्या कराराला अखेर मुहूर्त स्वरूप मिळाले. मुंबई पुणे या शहरात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही घोषणा नवी मुंबईतील एका कार्यक्रमात आज करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिंगापूरचे उपपंतप्रधान जान किम योंग, सीएलआयचे चेअरमन मनोहर खैतानी हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते. प्रसिद्धीपत्र काद्वारे सांगण्यात आल्याप्रमाणे कंपनीची २०१३ पासून उपस्थिती पुण्यातील हिंजेवाडी भागात आहे. इंटरनॅशनल टेक पार्क नावाने हा प्रकल्प सुरु झाला होता. त्यामुळे कंपनीने आपले पाऊल विस्तारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत या कंपनीने मुंबई पु ण्यात ६८०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात आणखी १९००० हजार कोटींची गुंतवणूक कंपनी करणार आहे. व्यवस्थापना अंतर्गत गुंतवणूकीत सध्याच्या ८ अब्ज डॉलरवरून वाढ करत १५ अब्ज डॉल रची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. ही वाढ २०२८ पर्यंत होणे अपेक्षित आहे असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले गेले आहे. ही गुंतवणूक औद्योगिक संकुल, लॉजिस्टिकस पायाउभारणी, डेटा सेंटर उभारणीसाठी होणार आहे. सीएलआयची पहिली पसंती महाराष्ट्रा ला देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक पोषक वातावरण पाहता आगामी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्च र पाहता कंपनीने गुंतवणूकीचा निर्णय घेतला आहे.

या गुंतवणूकीवर भाष्य करताना सीएलआय इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता म्हणाले की,'भारत हा CLI साठी एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्र, त्याच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टी आणि सुविकसित आयटी आणि औद्योगिक परि संस्थेसह (Eco System) आमच्यासाठी आमचा ठसा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देतो. गेल्या दशकात राज्य आमच्या विकास प्रवासात एक स्थिर भागीदार राहिले आहे आणि आम्हाला मिळालेल्या मजबूत पाठिंब्याची आणि सहकार्याची आम्ही कदर करतो. आम्ही आमच्या सूचीबद्ध ट्रस्ट, CLINT, आमचे खाजगी निधी आणि Ascendas-Firstspace प्लॅटफॉर्मद्वारे महाराष्ट्रात आमची गुंतवणूक वाढवत राहू. आम्ही आमची भागीदारी मजबूत करण्यास आणि महाराष्ट्राच्या व्यावसायिक आणि औद्योगिक विकासात आणखी योगदान देण्यास उत्सुक आहोत.'

तीन दशकांहून अधिक काळापासून भारतात असलेल्या उपस्थितीमुळे, सीएलआय (CLI) एकात्मिक रिअल अँसेट मॅनेजर, डेव्हलपर आणि ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी अद्वितीय स्थितीत आहे, जे उच्च-गुणवत्तेचे, शाश्वत प्रकल्प प्रदान (Sustainable) क रण्यासाठी मजबूत स्थानिक भागीदारीसह जागतिक कौशल्याचे संयोजन करते.
Comments
Add Comment

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई : गोरेगावच्या नेस्को मैदानावर आज (गुरुवार २ ऑक्टोबर २०२५) शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा