BMC News : मुंबईतील १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी होणार अर्ज सादर

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड


भाजपच्या करिष्म्याकडे सर्वांचे लक्ष


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी ०४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत. तर या सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजे गुरुवारी, शुक्रवारी आणि येत्या सोमवारी होणार आहेत. या तिन्ही टप्प्यातील निवडणुकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहे. एक ते दोन प्रभाग समिती वगळता उर्वरीत सर्व ठिकाणी बिनविरोधच निवडणूक प्रक्रिया पार पडली जाण्याची शक्यता आहे


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ तर तर शिवसेनेचे २९ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. तर उबाठाचे ६५, मनसेचे ०६ आणि काँग्रेसचे २४ तसेच एमआयएमचे ०८ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्यामुळे एल प्रभाग समिती अध्यक्षपद हे महायुतीकडे आता येणार आहे. त्यामुळे महायुतीकडे १७ पैंकी ०९ प्रभाग समिती जाणार असून उबाठा मनसे युतीकडे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सहा प्रभाग समिती राखल्या जाणार आहेत. तर एकमेव एस अँड टी प्रभाग समितीमध्ये महायुतीचे दहा तर उबाठा, काँग्रेस आणि मनसे यांचे दहा असल्यामुळे समसमान सदस्य संख्या आहे. त्यामुळे याठिकाणी जर काँग्रेस किंवा मनसे तटस्थ राहिल्यास भाजपच्या पारड्यात ही समिती पडेल, अन्यथा समसमान सदस्य संख्या असल्यामुळे ईश्वर चिठ्ठीद्वारे या प्रभाग समितीचा अध्यक्ष ठरला जाईल.


मुंबई महापालिकेत सन २०१७मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार मुंबईत उबाठाच्या हाती आठ प्रभाग समित्या होत्या. त्यातील दोन प्रभाग समित्या आता उबाठाला गमवण्याची वेळ आली आहे. तर भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका बजावली असली तरी त्यांच्याकडे ०९ प्रभाग समित्या होत्या. परंतु यावेळी ८९ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ०९ प्रभाग समित्या महायुतीकडे जावू शकतात.


महाविकास आघाडीकडे जाणाऱ्या सहा पैंकी दोन प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेसचे जास्त बळ असल्याने उबाठा आणि मनसे तसेच समाजवादी पक्षाच्यावतीने दोन प्रभाग समित्यांवर वर्चस्व असेल. त्यामुळे उबाठाला आपल्या बळावर केवळ चार प्रभाग समिती राखता येणार आहे.


आधी प्रभाग समिती, मग विशेष समित्यांच्या निवडणुका


विशेष म्हणजे सहा विशेष समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक घेतली जायची, तिथे यंदा प्रभाग समिती अध्यक्षपदाची प्रथम आणि त्यानंतर विशेष समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखला गेला आहे.


येत्या गुरुवारी ०५ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती :


सी अँड डी, ए,बी अँड ई, एफ दक्षिण व एफ उत्तर, आर उत्तर व आर मध्य, आर दक्षिण, पी पूर्व व पी पश्चिम


येत्या शुक्रवारी ०६ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


जी उत्तर, जी दक्षिण, पी दक्षिण, के पश्चिम, के उत्तर व के दक्षिण,


येत्या सोमवारी ०९ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


एल, एन, एस अँड टी, एम पश्चिम, एम पूर्व


महायुतीकडे राखल्या जाणाऱ्या संभाव्य प्रभाग समित्या : ०९


सी आणि डी, , के पश्चिम, पी दक्षिण, आर दक्षिण, आर उत्तर व आर मध्य, एम पश्चिम, एन विभाग, के उत्तर व के दक्षिण,एल


उबाठा, मनसे, काँग्रेस, सपाकडे या राहतील संभाव्य प्रभाग समित्या: ०६


ए,बी आणि ई, एफ दक्षिण व एफ उत्तर , जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, पी पूर्व व पी पश्चिम


एमआयएमच्या वाट्याला येणारी प्रभाग समिती : ०१


एम पूर्व प्रभाग


ईश्वर चिठ्ठीने काढली जाणारी प्रभाग समिती :०१


एस अँड टी प्रभाग

Comments
Add Comment

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या