Police Bharti Maharashtra 2025 : ठरलं तर मग, महाराष्ट्रात जम्बो पोलिस भरतीचं बिगुल! १५ हजार पदांसाठी आजच हिरवा कंदील

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज (मंगळवार) पार पडणार असून, त्यामध्ये तब्बल १५ हजार पोलिस पदांच्या भरतीसंदर्भात निर्णायक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या भरतीची घोषणा होऊन बराच कालावधी लोटला असला तरी, प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू होण्यात झालेल्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण होते. अनेक तरुणांनी तयारीसाठी वेळ, परिश्रम आणि आर्थिक गुंतवणूक केली असताना, प्रक्रिया लांबल्याने त्यांच्या संयमाची कठीण परीक्षा झाली. मात्र, अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही भरती प्रक्रिया अत्यंत जलदगतीने राबवली जाणार आहे. यामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भरती राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच पोलिस दलात तरुणांना संधी देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राज्यातील लाखो तरुणांचे डोळे लागले आहेत.



महायुती सरकारकडून मोठी घोषणा लवकरच


राज्यातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत महायुती सरकार आहे. लवकरच १४ हजार पोलिस पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस दलात नव्या व ताज्या दमाच्या तरुणांची भर पडणार असून, कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधींची वाढ आणि तरुणांना सरकारी सेवेत प्रवेश मिळणे या दोन्ही बाबतीत ही भरती मोलाची ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर भरतीसंदर्भातील जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पोलिस दलाला नवचैतन्य मिळेल, तसेच अनेक तरुणांच्या स्वप्नांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पोलिस भरतीची तारीख निश्चित होण्याची प्रतीक्षा सुरू होती. आता ही घोषणा होण्याच्या उंबरठ्यावर असून, राज्यातील युवकांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.



मंत्रिमंडळ बैठकीला भरत गोगावले गैरहजर; नाराजीच्या चर्चेला उधाण


आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगर दौऱ्यावर असल्याने त्यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला. मात्र, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे देखील बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रायगड जिल्ह्यात यावर्षी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे भरत गोगावले नाराज झाले असून ते दिल्लीला रवाना झाल्याच्या बातम्या समोर आल्या. तथापि, स्वतः भरत गोगावले यांनी या नाराजीच्या बातम्यांना फेटाळून लावत सांगितले की, ते दिल्लीत वैयक्तिक आणि अधिकृत कामानिमित्त गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणे हे केवळ कार्यक्रमातील अडचणीमुळे झाले असून, त्याचा नाराजीशी काहीही संबंध नाही. या घडामोडींमुळे रायगड आणि राज्यातील राजकीय वातावरणात मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे.


 

राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय



  • अन्न व नागरी पुरवठा विभाग –राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार.

  • विमानचालन विभाग – सोलापूर–पुणे–मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding देण्यास मान्यता. या निधीमुळे या मार्गावरील हवाईसेवा आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य होणार.

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांमधील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय. तसेच शासन हमीस ५ वर्षांची मुदतवाढ.

  • गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५,००० पदांच्या मोठ्या प्रमाणातील भरतीस मंजुरी.

Comments
Add Comment

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident)

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत

Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार!

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईचा महापौर कोण याबाबत

ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा,