देशातील ६११५ रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा - अश्विनी वैष्णव


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील ,११५ रेल्वे स्थानकांवर मोफत Wi-Fi सुविधा देत आहे. ही माहिती सरकारने आज, मंगळवारी संसदेत दिली. रेल्वे स्थानकांवरील मोफत Wi-Fi सेवा ही ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल अंतर कमी करणे आहे.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, “भारतीय रेल्वेच्या जवळजवळ सर्व स्थानकांवर दूरसंचार सेवा प्रदात्यांमार्फत 4जी/5-जी कव्हरेज दिले जात आहे. या नेटवर्कचा वापर प्रवासी डेटा कनेक्टिव्हिटीसाठी करीत आहेत, ज्यामुळे त्यांना अधिक चांगला अनुभव मिळत आहे. याशिवाय, रेल्वेने 6,115 स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे.


या स्थानकांवर प्रवासी मोफत वायफायचा वापर करून एचडी व्हिडिओ पाहू शकतात, मनोरंजन सामग्री डाउनलोड करू शकतात आणि ऑफिसचे कामही करू शकतात. वायफाय सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या स्मार्टफोनवर वायफाय मोड सुरू करावा लागतो आणि ‘RailWire’ Wi-Fi शी कनेक्ट व्हावे लागते. त्यानंतर त्यांना ओटीपी मिळवण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक द्यावा लागतो आणि ओटीपी टाकल्यावर वायफाय कनेक्टिव्हिटी मिळते.


ही वायफाय सेवा नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद अशा प्रमुख स्थानकांबरोबरच अनेक टियर-2 आणि टियर-3 शहरांतील स्थानकांवरही उपलब्ध आहे. यात सूरत, वडोदरा, राजकोट, मेरठ, भोपाळ यांसारखी टियर-2 शहरे तसेच रोहतक आणि कटक यांसारखी टियर-3 शहरे समाविष्ट आहेत.


भारतीय रेल्वे स्थानकांवरील मोफत वायफाय सेवा रेल्वे मंत्रालयाच्या अधीन असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) रेलटेलमार्फत ‘RailWire’ ब्रँडद्वारे दिली जाते. पूर्वी या प्रकल्पासाठी रेलटेलने गुगल आणि टाटा ट्रस्ट्स यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी केली होती, परंतु आता ही सेवा रेलटेल स्वतः व्यवस्थापित करत आहे.


Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय