देशातील ६११५ रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा - अश्विनी वैष्णव


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील ,११५ रेल्वे स्थानकांवर मोफत Wi-Fi सुविधा देत आहे. ही माहिती सरकारने आज, मंगळवारी संसदेत दिली. रेल्वे स्थानकांवरील मोफत Wi-Fi सेवा ही ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल अंतर कमी करणे आहे.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, “भारतीय रेल्वेच्या जवळजवळ सर्व स्थानकांवर दूरसंचार सेवा प्रदात्यांमार्फत 4जी/5-जी कव्हरेज दिले जात आहे. या नेटवर्कचा वापर प्रवासी डेटा कनेक्टिव्हिटीसाठी करीत आहेत, ज्यामुळे त्यांना अधिक चांगला अनुभव मिळत आहे. याशिवाय, रेल्वेने 6,115 स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे.


या स्थानकांवर प्रवासी मोफत वायफायचा वापर करून एचडी व्हिडिओ पाहू शकतात, मनोरंजन सामग्री डाउनलोड करू शकतात आणि ऑफिसचे कामही करू शकतात. वायफाय सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या स्मार्टफोनवर वायफाय मोड सुरू करावा लागतो आणि ‘RailWire’ Wi-Fi शी कनेक्ट व्हावे लागते. त्यानंतर त्यांना ओटीपी मिळवण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक द्यावा लागतो आणि ओटीपी टाकल्यावर वायफाय कनेक्टिव्हिटी मिळते.


ही वायफाय सेवा नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद अशा प्रमुख स्थानकांबरोबरच अनेक टियर-2 आणि टियर-3 शहरांतील स्थानकांवरही उपलब्ध आहे. यात सूरत, वडोदरा, राजकोट, मेरठ, भोपाळ यांसारखी टियर-2 शहरे तसेच रोहतक आणि कटक यांसारखी टियर-3 शहरे समाविष्ट आहेत.


भारतीय रेल्वे स्थानकांवरील मोफत वायफाय सेवा रेल्वे मंत्रालयाच्या अधीन असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) रेलटेलमार्फत ‘RailWire’ ब्रँडद्वारे दिली जाते. पूर्वी या प्रकल्पासाठी रेलटेलने गुगल आणि टाटा ट्रस्ट्स यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी केली होती, परंतु आता ही सेवा रेलटेल स्वतः व्यवस्थापित करत आहे.


Comments
Add Comment

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने