ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

  87

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची हजेरी लागली. माजी भारतीय कर्णधार मिताली राज आणि माजी भारतीय फलंदाज युवराज सिंग यांच्यासह हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांसारख्या महिला क्रिकेटपटूंनी पॅनेल चर्चेत सहभाग घेतला. या कार्यक्रमात ‘ICC Women’s Cricket World Cup २०२५’ च्या ट्रॉफी टूरलाही औपचारिक सुरुवात करण्यात आली.


कार्यक्रमाचे उद्घाटन ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी केले. त्यांच्या हस्ते पॅनेल चर्चेचे आयोजन झाले, ज्यामध्ये महिला क्रिकेटच्या वाढीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता हेही या कार्यक्रमात उपस्थित होते जय शाह म्हणाले, “ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ भारतात परत येत आहे, आणि हा महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. हा स्पर्धेचा दर्जा जागतिक पातळीवर आणखी उंचावेल. महिला क्रिकेटच्या वाढीसाठी आम्ही नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देत आहोत. अशा चर्चांमुळे आमचा सामूहिक दृष्टिकोन आकार घेतो आणि खेळाच्या प्रगतीसाठी दिशा मिळते.”



ते पुढे म्हणाले, “फक्त ५० दिवस उरले असताना स्पर्धेची तयारी जोमात सुरू आहे आणि उत्साहही शिगेला पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत सर्व संघांना माझ्या शुभेच्छा. मला खात्री आहे की सर्व खेळाडूंना हा अनुभव अविस्मरणीय ठरेल.”



या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने खेळवली जाईल. महिला क्रिकेटमधील ही पहिली मोठी जागतिक स्पर्धा आहे जी २०१६ नंतर उपखंडात होणार आहे. याआधी भारताने महिला विश्वचषकाचे आयोजन १९७८, १९९७ आणि २०१३ मध्ये केले होते.



स्पर्धेच्या प्रचारासाठी आयोजित ‘ट्रॉफी टूर’ सर्व यजमान शहरांमध्ये तसेच दिल्ली आणि मुंबईत फिरणार आहे. मार्गातील प्रसिद्ध स्थळांवर थांबत ही ट्रॉफी चाहत्यांसाठी खुली राहील. चाहत्यांना @icctrophytour या इन्स्टाग्राम चॅनेलद्वारे टूरचे थेट अपडेट मिळणार आहेत. ट्रॉफी टूर दरम्यान प्रत्येक यजमान शहरातील शाळांना भेट दिली जाईल. ‘स्कूल लेगसी प्रोग्राम’ अंतर्गत BCCI आणि ICC मिळून निवडक शाळांतील विद्यार्थ्यांना सामन्यांना उपस्थित राहण्याची संधी देणार आहेत. ही मोहीम आणि कार्यक्रमामुळे महिला क्रिकेटचा उत्साह आणखी वाढणार असून, येत्या ५० दिवसांत स्पर्धेची रंगत अधिक चढणार आहे.

Comments
Add Comment

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र

जरांगे आरक्षण मिळेपर्यंत पाणी पण बंद करणार

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मराठा आरक्षणसाठी युवकाची आत्महत्या

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत