कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने भाविकांसाठी दर्शन बंद राहणार आहे. दोन दिवसाच्या कालावधीत भाविकांना देवीच्या उत्सवमूर्ती व श्रीकलशाचे दर्शन घेता येईल. यानंतर म्हणजेच बुधवार १३ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे.

देवी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी सोमवार ११ आणि मंगळवार १२ ऑगस्ट रोजी कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन बंद असेल. या कालावधीत भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन बुधवार १३ ऑगस्ट २०२५ पासून पुन्हा सुरू होणार आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून परवानगी घेतल्यानंतरच देवी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला आहे. मूर्ती दीर्घकाळ सुस्थितीत ठेवण्याच्या उद्देशानेच संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे.मूर्ती संवर्धनासाठी गाभाऱ्यामध्ये फक्त तज्ज्ञांनाच प्रवेश दिला जाईल. श्रावणी सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

वर्धापन दिनी चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रात आज पूरग्रस्थ स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात

एमपीएससीची २८ सप्टेंबरची परीक्षा या दिवशी होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. नव्या

राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांची बदली

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या

मुंबईत ॲप-आधारित वाहन चालकांवर कारवाई; नियम मोडल्यास थेट दंड आणि एफआयआर!

मुंबई : राज्य शासनाच्या नव्या आदेशांनुसार, ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन न

गडचिरोलीतील भामरागडला यंदाच्या वर्षी पाचव्यांदा पुराचा फटका

गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही

Sameer Wankhede : समीर वानखेडेचा आर्यन खानवर मानहानीचा आरोप; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात महत्वपूर्ण सुनावणी

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या दिग्दर्शन पदार्पणामुळे चर्चेत असतानाच,