शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली.


वरळी येथे नारळी पौर्णिमेच्या दिवशी उबाठाचे आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते तसेच दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि काही शिवसैनिक आमनेसामने आले. त्यादरम्यान झालेल्या गोंधळात गोंधळात उबाठाकडून शिवसेना महिला शाखाप्रमुखा पूजा बरिया यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे सदस्य असलेल्या सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



काय आहे प्रकरण?


सिद्धेश शिंदे यांनी नारळी पौर्णिमेवेळी झालेल्या गर्दीत पूजा बारिया यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे, ज्यात त्यांना दुखापत देखील झाली. ज्यामुळे सिद्धेश शिंदे यांच्यावर दादर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम ११५(२) अंतर्गत अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली.


यादरम्यान, पूजा बरिया यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले की, 'आम्हाला चिथावणी देऊन आमच्याकडून हात उचलावा, असा त्यांचा प्रयत्न होता.' त्यावर गोऱ्हे यांनी पूजाला धीर देत 'आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत,' असे सांगितले. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि आगामी मुंबई महानगरपालिकेतील पराभवाच्या भीतीने उबाठा गटात नैराश्य पसरले आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी पूजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. तसेच, उबाठा गटाने केलेल्या या गैर कृत्याद्वारे महिलांचा अपमान केला आहे, असेही गोऱ्हे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे