पंतप्रधान आज कर्नाटकात, नागपूर-पुणेसह तीन वंदे भारत एक्सप्रेसना दाखवणार हिरवा झेंडा

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० ऑगस्ट रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता बेंगळूरु इथल्या केएसआर रेल्वे स्थानकावर ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते बेंगळूरु मेट्रोच्या यलो लाईनला हिरवा झेंडा दाखवतील, यासोबतच ते आर.व्ही. रोड (रागीगुड्डा) ते इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करणार आहेत.


आपल्या कर्नाटक भेटीत पंतप्रधान दुपारी 1 वाजता बेंगळूरुमधील शहरी दळणवळणीय जोडणीशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यासोबत ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.


पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळूरु मेट्रो फेज-2 प्रकल्पाच्या आर.व्ही. रोड (रागीगुड्डा) ते बोम्मसंद्रा या यलो लाईनचे उद्घाटनही होणर आहे. या मार्गिकेची लांबी 19 किमी पेक्षा जास्त असून, या मार्गिकेवर 16 स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 7,160 कोटी रुपये खर्च केला गेला आहे. यलो लाईन सुरू झाल्याने बेंगळूरुमधील मेट्रो जाळ्याचा विस्तार 96 किमीपेक्षा जास्त होणार असून, त्याचा या भागातील मोठ्या लोकसंख्येला फायदा होणार आहे.


आपल्या कर्नाटक भेटीत पंतप्रधान बेंगळूरु मेट्रो फेज-3 प्रकल्पाची पायाभरणीही करणार आहेत. या प्रकल्पासाठी 15,610 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पाची एकूण लांबी 44 किमी पेक्षा जास्त असणार असून, या प्रकल्पाअंतर्गत 31 उन्नत स्थानके असणार आहेत. या पायाभूत प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल, तसेच निवासी, औद्योगिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्र परस्परांशी जोडली जातील.


पंतप्रधान बेंगळूरु इथून 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवणार आहेत. याअंतर्गत बेंगळूरु ते बेळगावी, अमृतसर ते श्री माता वैष्णो देवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे. या अति उच्च वेगाच्या रेल्वे गाड्यांमुळे प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा लक्षणीय विस्तार होईल, प्रवासाच्या वेळेची बचत होईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभवही मिळू शकणार आहे.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या