मोरबे धरणाच्या पातळीत घट

  104

नवी मुंबईकरांची वाढली पाण्याची चिंता


वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत ऑगस्ट महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा आहे. सन २०२३-२४ मध्ये ७ ऑगस्ट रोजी ९१.७३ टक्के भरले होते. गतवर्षी सन २०२४-२५ मध्ये देखील ९२.२३ टक्के धरण भरले होते. पण यावर्षी धरण फक्त ८१.२१ टक्केच भरलेले आहे. त्यामध्ये गत दोन वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली असून आतपासून नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


नारळी पौर्णिमेनंतर पाऊसाचा वेग मंदावतो. त्यामुळे आता पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या वर्षी मे महिन्यापासून पाऊसांने सुरुवात केली होती. तर जुन- जुलै महिन्यात देखील समाधानकारक पाऊस झाला होता. पण ऑगस्ट महिन्यापासून पाऊसाने हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा साठा कमी आहे.


मोरबे धरण हे ८८ मीटर ला पुर्ण क्षमतेने भरत असते. पण आतापर्यंत धरणांत ८४.१७ मीटर इतकेच धरण भरले आहे. गत वर्षी धरणांची पातळी ही ८६.४७ टक्के भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत धरणात जवळपास दोन मीटरने कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसाने हुलकावणी दिल्यामुळे नवी मुंबईची डोकेदुखी वाढली आहे. मोरबे धरणात २१ एप्रिल २०२६ पर्यत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मेघगर्जनेसह कोसळणार पावसाची धार! 'या' भागात अलर्ट जारी; पहा २४ तास कसे असेल हवामान?

Comments
Add Comment

ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांचा विरोध ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची

Raj Thackeray on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

ठाणे: मराठा आरक्षणाच्या विषयावरुन मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आज त्यांच्या

गणेशमूर्तींचा बोटीने प्रवास, भिवंडीकरांचा कोंडीवर उपाय

भिवंडी (प्रतिनिधी) : वाहतूक कोंडीचे विघ्न बाप्पांच्या मार्गातही येत आहे. वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे जिल्ह्यातील

Eknath Shinde: रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बाईकस्वाराच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री, ताफा थांबवून केली मदत

ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या