मोरबे धरणाच्या पातळीत घट

  41

नवी मुंबईकरांची वाढली पाण्याची चिंता


वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत ऑगस्ट महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा आहे. सन २०२३-२४ मध्ये ७ ऑगस्ट रोजी ९१.७३ टक्के भरले होते. गतवर्षी सन २०२४-२५ मध्ये देखील ९२.२३ टक्के धरण भरले होते. पण यावर्षी धरण फक्त ८१.२१ टक्केच भरलेले आहे. त्यामध्ये गत दोन वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली असून आतपासून नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


नारळी पौर्णिमेनंतर पाऊसाचा वेग मंदावतो. त्यामुळे आता पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या वर्षी मे महिन्यापासून पाऊसांने सुरुवात केली होती. तर जुन- जुलै महिन्यात देखील समाधानकारक पाऊस झाला होता. पण ऑगस्ट महिन्यापासून पाऊसाने हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा साठा कमी आहे.


मोरबे धरण हे ८८ मीटर ला पुर्ण क्षमतेने भरत असते. पण आतापर्यंत धरणांत ८४.१७ मीटर इतकेच धरण भरले आहे. गत वर्षी धरणांची पातळी ही ८६.४७ टक्के भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत धरणात जवळपास दोन मीटरने कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसाने हुलकावणी दिल्यामुळे नवी मुंबईची डोकेदुखी वाढली आहे. मोरबे धरणात २१ एप्रिल २०२६ पर्यत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मेघगर्जनेसह कोसळणार पावसाची धार! 'या' भागात अलर्ट जारी; पहा २४ तास कसे असेल हवामान?

Comments
Add Comment

बांबूच्या चटईतून बाप्पाची शाश्वत आरास

देसले कुटुंबाचा संस्कृतीस्नेही उपक्रम ठाणे : गणेशोत्सव हा फक्त भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि

Thane Varsha Marathon Winner: ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर! पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते

ठाणे,: 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला जीव! रुग्णवाहिकेतच महिलेचा तडफडून मृत्यू

पालघर: गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून यात आहे. मात्र

सणासुदीला ठाण्यात वाहतूक कोंडीचा महाकाय विळखा!

ठाणे : रक्षाबंधन सणादरम्यान शनिवारी हजारो प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड वाहतूक

दिवाळीत पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना

गणेशोत्सव तोंडावर; मंडप अर्ज पडून, ८८ गणेश मंडळांच्या अर्जाला परवानगी मिळेना

ठाणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे मात्र अजूनही ८८ गणेश मंडळांच्या अर्जाला परवानगी मिळाली नाही.