डांबरीकरणासाठी शहाड पूल पुन्हा बंद

वाहतूक बंदीमुळे वाहनचालकांना २० दिवस मनस्ताप


उल्हासनगर : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल पुन्हा ३ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत डांबरीकरणासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने हे काम हाती घेणार असून, या काळात पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुलावरील परिस्थिती जैसे थे असल्याची वाहनचालकांकडून तक्रार केली जात होती. आता डांबरीकरणाचे काम होणार असल्याने पुन्हा २० दिवस वाहनचालकांसाठी कोंडीचे ठरणार आहेत.


उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत येणाऱ्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने ठाणे वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यानुसार याबाबतची अधिसूचना जारी करून वाहनचालकांना माहिती दिली आहे.


प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कसे असतील याबाबत वाहतूक पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. यात अहिल्यानगरकडून माळशेजमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मुरबाडच्या वेशीवर बारवी डॅम फाटा येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग हा बारवी धरण रस्ता - बदलापूर रस्ता - बदलापूर - पालेगाव - नेवाळी नाका - मंलग रस्ता - लोढा पलावा/शिळ-डायघर रस्ता - पत्रीपूल - कल्याण मार्गे पुढे जातील.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

कल्याण : कल्याण शहराच्या (Kalyan) ऐतिहासिक वारशाचा (Heritage) महत्त्वाचा भाग असलेल्या भटाळे तलावाच्या (Bhatale Lake) पुनरुज्जीवन

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)