स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गुन्हे

कर्जत : कर्जत तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. या समस्येबाबत शनिवारी ‘कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती’च्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले. यामध्ये मागील वर्षी केलेल्या आंदोलनातील काही मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, ऑनलाइन काम करणारे युवक, उद्योजक, फार्म हाऊस व्यावसायिक इत्यादींचे मोठे नुकसान होत आहे. विजेवरील उपकरणे खराब होत असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात
होत आहे.

त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ तसेच घरोघरी सर्वाधिक वीज लागते, त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच विजेची कामे तत्काळ पूर्ण करावीत, तसेच या काळात २४ तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली.
Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या