स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गुन्हे

कर्जत : कर्जत तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. या समस्येबाबत शनिवारी ‘कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती’च्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले. यामध्ये मागील वर्षी केलेल्या आंदोलनातील काही मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, ऑनलाइन काम करणारे युवक, उद्योजक, फार्म हाऊस व्यावसायिक इत्यादींचे मोठे नुकसान होत आहे. विजेवरील उपकरणे खराब होत असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात
होत आहे.

त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ तसेच घरोघरी सर्वाधिक वीज लागते, त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच विजेची कामे तत्काळ पूर्ण करावीत, तसेच या काळात २४ तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली.
Comments
Add Comment

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी