उत्तरकाशीत ढगफुटी, पूर, भूस्खलन; महाराष्ट्रातील एक महिला पर्यटक अद्याप बेपत्ता

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला आणि पूर आला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांची कोंडी झाली होती. संकटात सापडलेल्या स्थानिकांना आणि पर्यटकांना तातडीने मदतकार्य करुन वाचवण्यात आले. संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आता सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पर्यटकांना जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प येथे आणण्यात आले असून ते सुखरूप आहेत. पण एक महिला पर्यटक कृतिका जैन अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षित ठिकाणी पोहोचलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांपैकी बहुतांश पर्यटक राज्यात परतत आहेत. काही पर्यटक त्यांच्या पुढील यात्रांसाठी रवाना झाले आहेत. ही माहिती महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाराज हे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे घडलेल्या घटनेनंतर तातडीने राज्यातील पर्यटकांच्या मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. राज्य शासनाने उत्तरकाशीत राज्यातले पर्ययटक संकटात सापडल्याचे कळताच विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला होता. या कक्षाद्वारे नातलग, पर्यटक आणि सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय निर्माण करण्यात आला. राज्यातील पर्यटक नागरिकांना आवश्यक मदत पोहचवून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राधान्य देण्यात आले, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

उत्तराखंड सरकार, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्रातील प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केले. आपापसांत समन्वय राखला. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. जे पर्यटक राज्यात परतणार आहेत त्यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयातून परतीची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे उत्तरकाशी येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे