उत्तरकाशीत ढगफुटी, पूर, भूस्खलन; महाराष्ट्रातील एक महिला पर्यटक अद्याप बेपत्ता

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस पडला आणि पूर आला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांची कोंडी झाली होती. संकटात सापडलेल्या स्थानिकांना आणि पर्यटकांना तातडीने मदतकार्य करुन वाचवण्यात आले. संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आता सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पर्यटकांना जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प येथे आणण्यात आले असून ते सुखरूप आहेत. पण एक महिला पर्यटक कृतिका जैन अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षित ठिकाणी पोहोचलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांपैकी बहुतांश पर्यटक राज्यात परतत आहेत. काही पर्यटक त्यांच्या पुढील यात्रांसाठी रवाना झाले आहेत. ही माहिती महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाराज हे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे घडलेल्या घटनेनंतर तातडीने राज्यातील पर्यटकांच्या मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. राज्य शासनाने उत्तरकाशीत राज्यातले पर्ययटक संकटात सापडल्याचे कळताच विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला होता. या कक्षाद्वारे नातलग, पर्यटक आणि सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय निर्माण करण्यात आला. राज्यातील पर्यटक नागरिकांना आवश्यक मदत पोहचवून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राधान्य देण्यात आले, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

उत्तराखंड सरकार, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्रातील प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केले. आपापसांत समन्वय राखला. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. जे पर्यटक राज्यात परतणार आहेत त्यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयातून परतीची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे उत्तरकाशी येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या