विरार–डहाणू चौपदरीकरणाचा वेग कासवगतीने

पालघर : विरार ते डहाणू रोडदरम्यानच्या पश्चिम रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण काम अपेक्षेपेक्षा खूपच संथ गतीने सुरू असून, मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प आता आणखी चार वर्षांनी म्हणजे जून २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.


माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या दोन वेगवेगळ्या उत्तरांतील विसंगतीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. ठरलेला पाच वर्षांचा प्रकल्प आता किमान दहा वर्षांवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



प्रत्येक वर्षी होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३,५७८ कोटी इतका सांगितला होता; मात्र विलंबामुळे हा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.


सध्याच्या दोन मार्गांवरील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. चौपदरीकरणामुळे गाड्यांचे वेळापत्रक सुधारेल आणि प्रवास सुरक्षित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रकल्प वारंवार लांबणीवर गेल्याने प्रवाशांचा त्रास वाढत आहे आणि संताप उसळला आहे.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

समृद्धी महामार्गावर खिळे नाही, तर ॲल्युमिनिअम नोजल्स! बेशिस्त कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही

मुंबईत अग्निवीरानेच रायफल चोरली, कारण काय? दोघांना तेलंगणात अटक

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराची (नेव्ही कर्मचारी) रायफल चोरणाऱ्या दोन फरार

सोन्याच्या किंमती आणखी एका उच्चांकावर 'या' कारणामुळे

मोहित सोमण: सोन्याने आणखी एक उच्चांक गाठला आहे. जागतिक पातळीवरील भूराजकीय स्थितीचा फटका जागतिक सोन्याच्या

Urban Company IPO ला पहिल्या दिवशीच 'रंपाट' प्रतिसाद ! किरकोळ गुंतवणूकदारांचा तुडुंब प्रतिसाद 'या' GMP सह

मोहित सोमण: आज अर्बन कंपनी लिमिटेड आयपीओसाठी बाजारात सचीबद्ध (Listed) झाला आहे. पहिल्याद दिवशी आयपीओने कमाल केली आहे.

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

सोलापूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी