Raksha Bandhan 2025: सीमेवर अनोखे रक्षाबंधन! जवानांना बांधली 'ऑपरेशन सिंदूर'ची राखी

जम्मू काश्मीर: देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2025) पवित्र सण साजरा केला जात आहे, देशाच्या जम्मू काश्मीर सीमेवर देखील हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच, सीमेवरील शाळकरी मुली आणि महिलांनी येथे तैनात असलेल्या बीएसएफ जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले.


शाळकरी मुलींनी खास तयार केलेली 'ऑपरेशन सिंदूर' राखी सोबत आणली आणि रात्रंदिवस देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मनगटांवर रक्षासूत्र बांधले. यावेळी, सैनिक भावुक झाले आणि म्हणाले, "जसे आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये देशवासीयांचे रक्षण केले, तसेच भविष्यातही पूर्ण निष्ठेने त्यांचे रक्षण करत राहू."


रक्षाबंधन सणाच्या एक दिवस आधी, लष्कर, आयटीबीपी, एसएसबी सैनिकांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. शुक्रवारी एजा फाउंडेशनसह विविध संघटनांनी सीमा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांना राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुष्याची शुभेच्छा दिल्या. यादरम्यान माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा दीपिका बोहर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचा समारोप झाला. कर्नल गौरव नेगी, कर्नल बिरेंद्र सिंह दानु, सुभेदार मेजर कुलदीप सिंह, अनिता सामंत, गीता पांडे, भावना सौन, ज्योती धामी, शोभा भट्ट इत्यादी उपस्थित होते.



कच्छमध्ये देखील रक्षाबंधन साजरा 


रक्षाबंधनाच्या निमित्ताने कच्छ येथील स्थानिक महिलांनी सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले यादरम्यान काही महिला सैन्यांनी स्थानिक महिलांसोबत गरबा देखील खेळला. कच्छचे खासदार विनोदभाई चावडा हे देखील या समारंभात उपस्थित होते.





सीमेवरील या अनोख्या रक्षाबंधनाने केवळ सणाची गोडवा वाढवली नाही तर सैनिक आणि स्थानिक लोकांमधील भावनिक बंधही अधिक घट्ट केला.



राखी बाजारात ऑपरेशन सिंदूरची लहर


भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर संसदेत दीर्घ चर्चा झाली असताना, आता रक्षाबंधनावर भारतीय सैन्याच्या या मोहिमेचा सामान्य लोकांना सार्थ अभिमान वाटत असल्याचे दिसून आले आहे. राखी बाजारातही ऑपरेशन सिंदूरचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यावेळी बाजारात सिंदूर रंगाच्या राख्यांना प्रचंड मागणी आहे. इतकेच नव्हे तर भारतीय बाजारपेठेने देखील बहिणींचा हा हेतू याआधीच ओळखला होता. त्यामुळे बाजारातील प्रत्येक दुकानात सिंदूर रंगाच्या राख्यांना मोठी मागणी आहे.

Comments
Add Comment

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने