Raksha Bandhan 2025: सीमेवर अनोखे रक्षाबंधन! जवानांना बांधली 'ऑपरेशन सिंदूर'ची राखी

जम्मू काश्मीर: देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2025) पवित्र सण साजरा केला जात आहे, देशाच्या जम्मू काश्मीर सीमेवर देखील हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच, सीमेवरील शाळकरी मुली आणि महिलांनी येथे तैनात असलेल्या बीएसएफ जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले.


शाळकरी मुलींनी खास तयार केलेली 'ऑपरेशन सिंदूर' राखी सोबत आणली आणि रात्रंदिवस देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मनगटांवर रक्षासूत्र बांधले. यावेळी, सैनिक भावुक झाले आणि म्हणाले, "जसे आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये देशवासीयांचे रक्षण केले, तसेच भविष्यातही पूर्ण निष्ठेने त्यांचे रक्षण करत राहू."


रक्षाबंधन सणाच्या एक दिवस आधी, लष्कर, आयटीबीपी, एसएसबी सैनिकांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. शुक्रवारी एजा फाउंडेशनसह विविध संघटनांनी सीमा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांना राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुष्याची शुभेच्छा दिल्या. यादरम्यान माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा दीपिका बोहर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचा समारोप झाला. कर्नल गौरव नेगी, कर्नल बिरेंद्र सिंह दानु, सुभेदार मेजर कुलदीप सिंह, अनिता सामंत, गीता पांडे, भावना सौन, ज्योती धामी, शोभा भट्ट इत्यादी उपस्थित होते.



कच्छमध्ये देखील रक्षाबंधन साजरा 


रक्षाबंधनाच्या निमित्ताने कच्छ येथील स्थानिक महिलांनी सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले यादरम्यान काही महिला सैन्यांनी स्थानिक महिलांसोबत गरबा देखील खेळला. कच्छचे खासदार विनोदभाई चावडा हे देखील या समारंभात उपस्थित होते.





सीमेवरील या अनोख्या रक्षाबंधनाने केवळ सणाची गोडवा वाढवली नाही तर सैनिक आणि स्थानिक लोकांमधील भावनिक बंधही अधिक घट्ट केला.



राखी बाजारात ऑपरेशन सिंदूरची लहर


भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर संसदेत दीर्घ चर्चा झाली असताना, आता रक्षाबंधनावर भारतीय सैन्याच्या या मोहिमेचा सामान्य लोकांना सार्थ अभिमान वाटत असल्याचे दिसून आले आहे. राखी बाजारातही ऑपरेशन सिंदूरचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यावेळी बाजारात सिंदूर रंगाच्या राख्यांना प्रचंड मागणी आहे. इतकेच नव्हे तर भारतीय बाजारपेठेने देखील बहिणींचा हा हेतू याआधीच ओळखला होता. त्यामुळे बाजारातील प्रत्येक दुकानात सिंदूर रंगाच्या राख्यांना मोठी मागणी आहे.

Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड