Raksha Bandhan 2025: सीमेवर अनोखे रक्षाबंधन! जवानांना बांधली 'ऑपरेशन सिंदूर'ची राखी

  48

जम्मू काश्मीर: देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2025) पवित्र सण साजरा केला जात आहे, देशाच्या जम्मू काश्मीर सीमेवर देखील हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच, सीमेवरील शाळकरी मुली आणि महिलांनी येथे तैनात असलेल्या बीएसएफ जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले.


शाळकरी मुलींनी खास तयार केलेली 'ऑपरेशन सिंदूर' राखी सोबत आणली आणि रात्रंदिवस देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मनगटांवर रक्षासूत्र बांधले. यावेळी, सैनिक भावुक झाले आणि म्हणाले, "जसे आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये देशवासीयांचे रक्षण केले, तसेच भविष्यातही पूर्ण निष्ठेने त्यांचे रक्षण करत राहू."


रक्षाबंधन सणाच्या एक दिवस आधी, लष्कर, आयटीबीपी, एसएसबी सैनिकांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. शुक्रवारी एजा फाउंडेशनसह विविध संघटनांनी सीमा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांना राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुष्याची शुभेच्छा दिल्या. यादरम्यान माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा दीपिका बोहर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचा समारोप झाला. कर्नल गौरव नेगी, कर्नल बिरेंद्र सिंह दानु, सुभेदार मेजर कुलदीप सिंह, अनिता सामंत, गीता पांडे, भावना सौन, ज्योती धामी, शोभा भट्ट इत्यादी उपस्थित होते.



कच्छमध्ये देखील रक्षाबंधन साजरा 


रक्षाबंधनाच्या निमित्ताने कच्छ येथील स्थानिक महिलांनी सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले यादरम्यान काही महिला सैन्यांनी स्थानिक महिलांसोबत गरबा देखील खेळला. कच्छचे खासदार विनोदभाई चावडा हे देखील या समारंभात उपस्थित होते.





सीमेवरील या अनोख्या रक्षाबंधनाने केवळ सणाची गोडवा वाढवली नाही तर सैनिक आणि स्थानिक लोकांमधील भावनिक बंधही अधिक घट्ट केला.



राखी बाजारात ऑपरेशन सिंदूरची लहर


भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर संसदेत दीर्घ चर्चा झाली असताना, आता रक्षाबंधनावर भारतीय सैन्याच्या या मोहिमेचा सामान्य लोकांना सार्थ अभिमान वाटत असल्याचे दिसून आले आहे. राखी बाजारातही ऑपरेशन सिंदूरचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यावेळी बाजारात सिंदूर रंगाच्या राख्यांना प्रचंड मागणी आहे. इतकेच नव्हे तर भारतीय बाजारपेठेने देखील बहिणींचा हा हेतू याआधीच ओळखला होता. त्यामुळे बाजारातील प्रत्येक दुकानात सिंदूर रंगाच्या राख्यांना मोठी मागणी आहे.

Comments
Add Comment

उत्तरकाशीच्या धारली आणि हर्षील गावाची परिस्थिती अजूनही बिकट! २५० लोकं अजूनही अडकलेले

उत्तरकाशी: उत्तरकाशीच्या धारली गावात झालेल्या आपत्तीनंतर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. धारलीकडे जाणारे सर्व

भारत निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत

अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये सीताधाम; अमित शाहांच्या हस्ते सीतेच्या मंदिरासाठी पायाभरणी

सीतामढ़ी : बिहारच्या सीतामढ़ी येथील पुनौरा धाम येथे माता जानकीच्या भव्य मंदिराचा शिलान्यास झाला. हा केवळ

निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

निवडणूक आयोगाने काढली राहुल गांधींच्या आरोपांतील हवा नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी

ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब अमेरिकेवरच आदळला! भारताबरोबरच या २ देशांनीही दिला दणका

टॅरिफमुळे अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा करार अडचणीत नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली IAF च्या विधानाने पाक बिथरला, म्हणाला "असे काहीच झाले नाही"

नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि