सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचा मुंबईतला सेट तोडला, शूटिंग रद्द

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात मुख्य कलाकराच्या भूमिकेत आहे. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या निवडक साहसी दृश्यांचे शूटिंग अर्थात चित्रिकरण मुंबईत करण्याचे नियोजन होते. या शूटिंगसाठी मुंबईत मेहबूब स्टुडिओमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्याचा सेट उभारला होता. हा सेट तोडण्यात आला आहे. सलमानच्या चित्रपटाचे मुंबईतले शूटिंग रद्द झाले आहे.

भारत आणि चीनच्या सैनिकांचा गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. या संघर्षाचा संदर्भ असलेला भारतीय कर्नलची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बॅटल ऑफ गलवान'. या चित्रपटाचे ऑगस्ट महिन्यात मुंबईत शूटिंग करायचे नियोजन होते. आता हे शूटिंग रद्द झाले आहे.

चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्येच सुरू होणार आहे. चित्रपटातील साहसी दृश्यांचे शूटिंग २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात होणार आहे. मुंबईतील सेटवरचे शूट आणि लडाखमधील शूट यात किमान ३० दिवसांचे अंतर राहणार होते. यामुळे चित्रपट सातत्य अर्थात सिनेमा कंटिन्यूटीवर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका होता. यामुळेच मुंबईतले ठरलेले सेटवरचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे.

'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात सलमान कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबूची भूमिका साकारत आहे. चित्रांगदा सिंग पहिल्यांदाच सलमानसोबत दिसणार आहे. जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज हे कलाकार पण या चित्रपटात दिसतील.

विषय संवेदनशील असल्यामुळे आवश्यक ती परवानगी घेतल्यानंतरच चित्रपटाच्या शूटिंगचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या