आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना दुःखद बातमी! तुमचा Minimum Balance लक्षणीत पटीत वाढणार?

प्रतिनिधी:आयसीआयसीआय बँकेकडून कमाल बँलन्स गरज (Minimum Balance Requirement) मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी दुःखद बातमी असल्याने ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसणार आहे. सगळ्या प्रकारच्या बचत खात्यासाठी हा नवा नियम लागू होणार आहे. १ ऑगस्टपासून हा नियम कार्यान्वित होणार आहे. शहरी व मे ट्रोपॉलिटन शहरात कमीत कमी ५०००० रूपयांची शिल्लक खातेदारांना ठेवावी लागेल तर निम शहरी भागातील ग्राहकांना २५००० रुपये शिल्लक ठेवावी लागेल. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा १० ००० रूपयांवर वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शहरी व मेट्रोपॉलिटन शहरासाठी ही मर्यादा १००००, निम शहरी भागासाठी २५०००, व ग्रामीण भागासाठी २५०० रूपये होती. या निर्णयाचा आर्थिक फटका देशातील बँकेच्या करोडो ग्राहकांना बसणार आहे. विशेषतः निम शहरी व ग्रामीण भागातील खातेदारांना या धोरणाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. जे ग्राहक रेग्युलेटरी पूर्तता न करता किमान शिल्लक (बँलन्स) ठेवणार नाहीत त्यांना बँक मोठा दंड आकारणार आहे.

ज्यांना इतकी रक्कम जमा ठेवणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी निर्णय धक्कादायक ठरू शकतो त्यामुळे सहाजिकच ग्राहकांमध्ये नाखुशी पसरण्याची शक्यता आहे कदाचित काही ग्राहक आप ले खाते देखील बंद करू शकतात. बँकेच्या माहितीनुसार, जो ग्राहक आपले खाते शिल्लक नियमित राखणार नाही त्याला तूटीवर ६% अथवा ५०० रूपये जो कमी आहे तो लागणार आहे. निवृत्ती धारकांना मात्र या निर्णयातून सुट मिळणार आहे.

ज्यांची फँमिली बँकिंग खाती असतील त्यांच्यासाठी आवश्यक त्या तरतूदीचे पालन करावे लागणार आहे. तरच त्यांना या दंडातून मुक्तता मिळेल. एकूण फँमिली बँकेच्या खात्यातील १.५ पटीने आवश्यक तरतूदीची पूर्तता न केल्यास तो दंड पडेल असे बँकेने म्हटले आहे. यावर अनेक ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली. या अपडेटवर प्रतिक्रिया देताना, अनेक वापरकर्त्यांनी बँक त्यांच्या संपत्तीच्या आधारे "ग्राहकांना फिल्टर" करत असल्याचा आरोप केला. काहींनी या निर्णयाला "एलिटिस्ट" म्हटले, तर काहींनी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

'ही नागरिकांची निव्वळ लूट आहे. @RBI लक्षात घ्या, त्यावर झोपू नका. आयसीआयसीआय जनतेच्या खर्चावर इतक्या मोठ्या रकमेवर व्याज मिळवणार आहे. @ICICIBank ला लाज वाटावी. मी शेअर बाजारातील व्यवहारांसाठी बँक खाते ठेवत होतो पण आता मी माझे बँक खाते बंद करणार आहे आणि माझ्या दुसऱ्या बँकेत जाणार आहे, जिथे ते शून्य आहे,' एका वापरकर्त्याने लिहिले.

'याला सार्वजनिक लूट म्हणतात. गरीब आणि उपेक्षित वर्गातील लोकांना बँकिंग सेवा नाकारणे. @ICICIBank द्वारे असे प्रवेश नियंत्रण निर्माण केल्याबद्दल भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्ग त हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व @RBI च्या नाकाखाली घडत आहे.'अशी टिप्पणी आणखी दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.
Comments
Add Comment

Devendra Fadanvis : "मंत्रिमंडळ 'हाऊसफुल्ल', बाहेरच्यांसाठी जागा नाही"! मुख्यमंत्र्यांकडून 'नो व्हॅकन्सी'चा 'बॉम्ब'; फडणवीसांचा नेमका टोला कुणाला?

ईश्वरपूर : राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे आणि सर्वच पक्षांचे

जीएसटी कर संकलनात दणदणीत वाढ- नोव्हेंबर महिन्यात कर संकलन १.७ लाख कोटी पार!

मोहित सोमण: जीएसटी कर संकलनात (GST Collection) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या महिन्यात जीएसटी कर संकलन ०.७%

Rupali Patil : 'डबल डच्चू'नंतर निर्णय! प्रवक्ते आणि स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्यानंतर रुपाली पाटील यांनी उचलले मोठे पाऊल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्या आणि पुण्यातील माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात धूळधाण! बाजारात सेन्सेक्स व निफ्टी उलट्या दिशेने गडगडला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: शेअर बाजारात अखेरच्या सत्रात धूळधाण उडाली आहे. त्यामुळे आठवड्यातील पहिल्या दिवसाची अखेर घसरणीत

Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru Wedding : भरजरी साडीत नववधू समंथा! अभिनेत्री समंथा प्रभूनं निर्माते राज निदिमोरूंसोबत गुपचूप उरकलं दुसरं लग्न; फोटो सोशल मीडियावर शेअर

साऊथची लोकप्रिय सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने चाहत्यांना मोठा धक्का देत गुपचूप दुसरं लग्न

मोठी बातमी: केंद्र सरकारकडून बेकायदेशीर ॲप आधारित कर्ज देणाऱ्या ८७ कंपन्यावर बंदी जाहीर

प्रतिनिधी: केंद्र सरकारने अनाधिकृत ७७ कर्ज देणाऱ्या फिनटेक कंपन्यावर मोठी कारवाई करत या अँपवर बंदी घालण्यात