आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना दुःखद बातमी! तुमचा Minimum Balance लक्षणीत पटीत वाढणार?

प्रतिनिधी:आयसीआयसीआय बँकेकडून कमाल बँलन्स गरज (Minimum Balance Requirement) मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी दुःखद बातमी असल्याने ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसणार आहे. सगळ्या प्रकारच्या बचत खात्यासाठी हा नवा नियम लागू होणार आहे. १ ऑगस्टपासून हा नियम कार्यान्वित होणार आहे. शहरी व मे ट्रोपॉलिटन शहरात कमीत कमी ५०००० रूपयांची शिल्लक खातेदारांना ठेवावी लागेल तर निम शहरी भागातील ग्राहकांना २५००० रुपये शिल्लक ठेवावी लागेल. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा १० ००० रूपयांवर वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शहरी व मेट्रोपॉलिटन शहरासाठी ही मर्यादा १००००, निम शहरी भागासाठी २५०००, व ग्रामीण भागासाठी २५०० रूपये होती. या निर्णयाचा आर्थिक फटका देशातील बँकेच्या करोडो ग्राहकांना बसणार आहे. विशेषतः निम शहरी व ग्रामीण भागातील खातेदारांना या धोरणाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. जे ग्राहक रेग्युलेटरी पूर्तता न करता किमान शिल्लक (बँलन्स) ठेवणार नाहीत त्यांना बँक मोठा दंड आकारणार आहे.

ज्यांना इतकी रक्कम जमा ठेवणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी निर्णय धक्कादायक ठरू शकतो त्यामुळे सहाजिकच ग्राहकांमध्ये नाखुशी पसरण्याची शक्यता आहे कदाचित काही ग्राहक आप ले खाते देखील बंद करू शकतात. बँकेच्या माहितीनुसार, जो ग्राहक आपले खाते शिल्लक नियमित राखणार नाही त्याला तूटीवर ६% अथवा ५०० रूपये जो कमी आहे तो लागणार आहे. निवृत्ती धारकांना मात्र या निर्णयातून सुट मिळणार आहे.

ज्यांची फँमिली बँकिंग खाती असतील त्यांच्यासाठी आवश्यक त्या तरतूदीचे पालन करावे लागणार आहे. तरच त्यांना या दंडातून मुक्तता मिळेल. एकूण फँमिली बँकेच्या खात्यातील १.५ पटीने आवश्यक तरतूदीची पूर्तता न केल्यास तो दंड पडेल असे बँकेने म्हटले आहे. यावर अनेक ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली. या अपडेटवर प्रतिक्रिया देताना, अनेक वापरकर्त्यांनी बँक त्यांच्या संपत्तीच्या आधारे "ग्राहकांना फिल्टर" करत असल्याचा आरोप केला. काहींनी या निर्णयाला "एलिटिस्ट" म्हटले, तर काहींनी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

'ही नागरिकांची निव्वळ लूट आहे. @RBI लक्षात घ्या, त्यावर झोपू नका. आयसीआयसीआय जनतेच्या खर्चावर इतक्या मोठ्या रकमेवर व्याज मिळवणार आहे. @ICICIBank ला लाज वाटावी. मी शेअर बाजारातील व्यवहारांसाठी बँक खाते ठेवत होतो पण आता मी माझे बँक खाते बंद करणार आहे आणि माझ्या दुसऱ्या बँकेत जाणार आहे, जिथे ते शून्य आहे,' एका वापरकर्त्याने लिहिले.

'याला सार्वजनिक लूट म्हणतात. गरीब आणि उपेक्षित वर्गातील लोकांना बँकिंग सेवा नाकारणे. @ICICIBank द्वारे असे प्रवेश नियंत्रण निर्माण केल्याबद्दल भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्ग त हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व @RBI च्या नाकाखाली घडत आहे.'अशी टिप्पणी आणखी दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.
Comments
Add Comment

लवकरच उभारले जाणार ‘मराठी भाषा भवन’; मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने विधानपरिषदेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या

Jahnavi Killekar : ‘ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र?’; रुचिता जामदारवर जान्हवी किल्लेकरची टीका, बिग बॉस व रितेश देशमुखांविरोधातील वक्तव्यांवर संताप

मुंबई : कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिने

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

सनरायजर्स लीड्सच्या काव्या मारनने पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेतल्याने समाज माध्यमावर संताप

मुंबई: काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट