'भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं पाडली'

बंगळुरू : ऑपरेशन सिंदूर कसे करायचे यासाठी मोदी सरकारने सैन्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. सैन्याच्या सर्व दलांनी परस्पर समन्वय राखून स्वतःचे प्राधान्यक्रम निश्चित केले आणि शत्रूवर हल्ल्याची एक प्रभावी योजना आखली. ही योजना कशी असावी किंवा कशी असू नये अशा स्वरुपाचे कोणतेही बंधन सरकारने सैन्यावर घातले नव्हते. हल्ला कधी सुरू करावा आणि कधी थांबवावा याबाबतचे निर्णय सैन्याने घेतले; असे भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे कसे मोडले याची माहिती त्यांनी दिली.



भारताच्या सैन्य दलांनी परस्पर समन्वय राखून एक प्रभावी योजना राबवली आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ३०० किमी. लांबून अचूक हल्ला केला. या हल्ल्याद्वारे भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. पाकिस्तानच्या नष्ट झालेल्या विमानांमध्ये एफ १६ विमानांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी केला. भारताने कसा एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानमध्ये काय वाताहात झाली याची सविस्तर माहिती त्यांनी एका सादरीकरणाद्वारे दिली. पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ नष्ट केल्याचेही एअर चीफ मार्शल म्हणाले.

एअर चीफ मार्शल एलएम कात्रे व्याख्यानात बोलताना एपी सिंग यांनी एस - ४०० क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात पाकिस्तानची विमानं नष्ट झाल्याचे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टिमने अर्थात एस - ४०० ने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. भारताच्या सर्व क्षेपणास्त्रांनी त्यांच्या लक्ष्यावर हल्ला केला, ज्यामध्ये रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाजवळील नूर खान एअरबेसला टार्गेट करण्यात आलं होतं. भारताने सलग दुसऱ्या दिवशी स्ट्राइक करुन पाकिस्तानचे अतिरेकी तळ नष्ट केले.

भारताने ९० मिनिटांचया एअर स्ट्राईकद्वारे नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफीकी एअरबेस, पंजाबमधील मुरीद एअरबेस, सिंधमधील सुक्कुर एअरबेस, सियालकोट एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कार्दू एअरबेस, कराचीजवळील भोलारी एअरबेस, जेकबाबाद एअरबेस आणि पसरूर एअरस्ट्रिपवर हल्ला केला, असे एअर चीफ मार्शल म्हणाले.

Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा