अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला मुदतवाढ

मुंबई : अकरावी अर्थात FYJC प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांची प्रक्रिया झाली आहे. आता अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीची प्रक्रिया सुरू आहे. या फेरीला सोमवार ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी या फेरीची मुदत ८ ऑगस्ट पर्यंतच होती. मात्र राज्य सरकारने नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनाच्या सुटीचा विचार करुन अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला सोमवार ११ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली.

ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. या फेरीसाठी प्राधन्यक्रम अंतिम केलेल्या ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधन्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत. ८ ऑगस्टपर्यंत या फेरीअंतर्गत ३ लाख १५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यातील नियमित फेरीमध्ये ३ लाख १० हजार ७०८ इतके प्रवेश झाले आहेत. तसेच कोटामध्ये ४ लाख ६०३ इतके प्रवेश झाले आहेत. ज्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांकडे सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे.
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या