Naresh Mhaske On Uddhav Thackeray : "अरेरे... ‘हिंदुत्व’ सोडलं आणि थेट शेवटच्या रांगेत! उद्धव ठाकरेंवर शिंदे गट अन् भाजपाचा तिखट प्रहार"

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी मतदार याद्यांतील अनियमितता आणि निवडणूक आयोगाविषयी प्रेझेंटेशन सादर केलं. बैठकीला उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र, समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये तिघेही शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसून आले. यावरून आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले जात आहेत.



राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ७ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, बैठकीपेक्षा जास्त चर्चेत आली ती तिची आसन व्यवस्था. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, असा मुद्दा उचलून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी थेट हल्ला चढवत म्हटलंय की, “हिंदुत्व आणि आपली विचारधारा सोडली की पदरात काय येतं? शेवटची रांग!” तर शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनीही सोशल मीडियावर, विशेषत: एक्स (Twitter) वरून, या घटनेची खिल्ली उडवली. त्यांनी सूचक पोस्ट करत उद्धव ठाकरे गटावर उपरोधिक टीका केली. राजकीय वर्तुळात आता हा मुद्दा चांगलाच तापला आहे. विरोधकांकडून उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय स्थानावर आणि आघाडीतल्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून, या “शेवटच्या रांगे”च्या वादावरून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.



काय म्हणाले नरेश म्हस्के?




भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य (Keshav Upadhyay) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसनव्यवस्थेच्या वादातून थेट हल्ला चढवला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, यावर भाष्य करताना उपाध्य म्हणाले, “उद्धव ठाकरे जेव्हा भाजपासोबत होते, तेव्हा त्यांना किती मान-सन्मान मिळायचा. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर येऊन त्यांचा सत्कार करत होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह स्वतः मातोश्रीवर आले होते.” ते पुढे म्हणाले — “पण तुम्ही हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि त्यातून मानही गेला, सन्मानही गेला. हातात पडलं काय? तर आता बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग!” असा जोरदार टोला त्यांनी लगावला. केशव उपाध्य यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि भाजप यांच्यातील जुना वाद पुन्हा पेटला आहे. या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध रंगले असून, ‘शेवटची रांग’ हा वाक्प्रचार राजकीय चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे.

Comments
Add Comment

UPSC : UPSCची मोठी कारवाई! AI तपासणीत परीक्षेपूर्वीच ६०० बनावट अर्ज बाद

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) २०२६ अधिक पारदर्शक (Transparent) आणि

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन

Raincore Trend : ओले रस्ते, स्टायलिश अंदाज : पावसाळी फॅशनमध्ये 'रेनकोर'चा डंका!

सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्या राम मंदिर दान घोटाळा प्रकरणात नवे वळण; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा

अयोध्या राम मंदिर दान घोटाळा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र