Naresh Mhaske On Uddhav Thackeray : "अरेरे... ‘हिंदुत्व’ सोडलं आणि थेट शेवटच्या रांगेत! उद्धव ठाकरेंवर शिंदे गट अन् भाजपाचा तिखट प्रहार"

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी मतदार याद्यांतील अनियमितता आणि निवडणूक आयोगाविषयी प्रेझेंटेशन सादर केलं. बैठकीला उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र, समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये तिघेही शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसून आले. यावरून आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले जात आहेत.



राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ७ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, बैठकीपेक्षा जास्त चर्चेत आली ती तिची आसन व्यवस्था. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, असा मुद्दा उचलून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी थेट हल्ला चढवत म्हटलंय की, “हिंदुत्व आणि आपली विचारधारा सोडली की पदरात काय येतं? शेवटची रांग!” तर शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनीही सोशल मीडियावर, विशेषत: एक्स (Twitter) वरून, या घटनेची खिल्ली उडवली. त्यांनी सूचक पोस्ट करत उद्धव ठाकरे गटावर उपरोधिक टीका केली. राजकीय वर्तुळात आता हा मुद्दा चांगलाच तापला आहे. विरोधकांकडून उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय स्थानावर आणि आघाडीतल्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून, या “शेवटच्या रांगे”च्या वादावरून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.



काय म्हणाले नरेश म्हस्के?




भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य (Keshav Upadhyay) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसनव्यवस्थेच्या वादातून थेट हल्ला चढवला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, यावर भाष्य करताना उपाध्य म्हणाले, “उद्धव ठाकरे जेव्हा भाजपासोबत होते, तेव्हा त्यांना किती मान-सन्मान मिळायचा. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर येऊन त्यांचा सत्कार करत होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह स्वतः मातोश्रीवर आले होते.” ते पुढे म्हणाले — “पण तुम्ही हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि त्यातून मानही गेला, सन्मानही गेला. हातात पडलं काय? तर आता बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग!” असा जोरदार टोला त्यांनी लगावला. केशव उपाध्य यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि भाजप यांच्यातील जुना वाद पुन्हा पेटला आहे. या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध रंगले असून, ‘शेवटची रांग’ हा वाक्प्रचार राजकीय चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या