Naresh Mhaske On Uddhav Thackeray : "अरेरे... ‘हिंदुत्व’ सोडलं आणि थेट शेवटच्या रांगेत! उद्धव ठाकरेंवर शिंदे गट अन् भाजपाचा तिखट प्रहार"

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी मतदार याद्यांतील अनियमितता आणि निवडणूक आयोगाविषयी प्रेझेंटेशन सादर केलं. बैठकीला उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र, समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये तिघेही शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसून आले. यावरून आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले जात आहेत.



राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ७ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, बैठकीपेक्षा जास्त चर्चेत आली ती तिची आसन व्यवस्था. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, असा मुद्दा उचलून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी थेट हल्ला चढवत म्हटलंय की, “हिंदुत्व आणि आपली विचारधारा सोडली की पदरात काय येतं? शेवटची रांग!” तर शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनीही सोशल मीडियावर, विशेषत: एक्स (Twitter) वरून, या घटनेची खिल्ली उडवली. त्यांनी सूचक पोस्ट करत उद्धव ठाकरे गटावर उपरोधिक टीका केली. राजकीय वर्तुळात आता हा मुद्दा चांगलाच तापला आहे. विरोधकांकडून उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय स्थानावर आणि आघाडीतल्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून, या “शेवटच्या रांगे”च्या वादावरून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.



काय म्हणाले नरेश म्हस्के?




भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य (Keshav Upadhyay) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसनव्यवस्थेच्या वादातून थेट हल्ला चढवला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, यावर भाष्य करताना उपाध्य म्हणाले, “उद्धव ठाकरे जेव्हा भाजपासोबत होते, तेव्हा त्यांना किती मान-सन्मान मिळायचा. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर येऊन त्यांचा सत्कार करत होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह स्वतः मातोश्रीवर आले होते.” ते पुढे म्हणाले — “पण तुम्ही हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि त्यातून मानही गेला, सन्मानही गेला. हातात पडलं काय? तर आता बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग!” असा जोरदार टोला त्यांनी लगावला. केशव उपाध्य यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि भाजप यांच्यातील जुना वाद पुन्हा पेटला आहे. या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध रंगले असून, ‘शेवटची रांग’ हा वाक्प्रचार राजकीय चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे.

Comments
Add Comment

Agni-6 Missile : भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे जगभर खळबळ; ओडिशा किनारपट्टीवरून ‘अग्नी-6’ क्षेपणास्त्र चाचणीची चर्चा

ओडिशा : भारताने गुरुवारी (७ मे) सायंकाळी Odisha किनारपट्टीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) चाचणी केल्याची

DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence

TVK crosses 118 mark : तमिळनाडूत थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक! एका झटक्यात फिरवला गेम, सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकीय मैदानातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सुरू

West Bengal Next Deputy CM : पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा 'महाराष्ट्र पॅटर्न'! भाजप देणार दोन उपमुख्यमंत्री ? शुभेंदू अधिकारींकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. मिळालेल्या ताज्या

Mumbai-Bengaluru Superfast Train : प्रवाशांची प्रतीक्षा संपली! मुंबई-बंगळुरू सुपरफास्ट ट्रेनला हिरवा कंदील; लवकरच 'वंदे भारत स्लीपर'चीही शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी बुधवारी प्रवाशांना एक मोठी

Telangana Shocking Video : भररस्त्यात थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; व्हिडिओ पहा

तेलंगणातील सूर्यापेट (Telangana Suryapet) जिल्ह्यातील कोदाड येथे बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना