अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि विमाने खरेदी करण्यावर भारताचा निर्बंध

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ (कर) लावल्यामुळे भारतात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने नवे अमेरिकन शस्त्रास्त्र व विमाने खरेदी करण्याची योजना तात्पुरती स्थगित केली आहे. याबाबतची माहिती या प्रकरणाशी संबंधित तीन भारतीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.


अमेरिकेच्या जनरल डायनॅमिक्स लँड सिस्टिम्स यांनी तयार केलेल्या स्ट्रायकर लढाऊ वाहनांची, तसेच रेथियॉन व लॉकहीड मार्टिन यांनी विकसित केलेल्या जैवलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रांची भारताकडून होणारी खरेदी सध्या टॅरिफमुळे थांबवण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात या शस्त्रास्त्रांच्या खरेदी आणि संयुक्त उत्पादनाची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्यातीवर टॅरिफ लावल्यानंतर, भारताकडून व्यक्त होणारा हा पहिला ठोस निषेध आहे, विशेषतः जेव्हा व्यापार अत्यंत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.


गेल्या ६ ऑगस्टला, ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केली होती आणि भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावले होते. त्यामुळे एकत्रित टॅरिफ ५० टक्क्यांवर पोहोचले आहे, जे कोणत्याही अमेरिकन व्यापार भागीदारासाठी सर्वाधिक आहे. त्यांनी असेही म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणास आर्थिक पाठबळ पुरवत आहे. जरी ट्रम्प यांचा टॅरिफबाबत धोरण झपाट्याने बदलणारा इतिहास असला तरी भारताने सांगितले आहे की, तो वॉशिंग्टनसोबत चर्चेत सक्रिय सहभागी आहे.


एका अधिकाऱ्याने सांगितले की, “टॅरिफ आणि द्विपक्षीय संबंधांची दिशा स्पष्ट झाल्यावरच संरक्षण खरेदी पुढे जाऊ शकते, पण ते लगेच घडणार नाही.” एका दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, खरेदी थांबवण्यासाठी कोणतेही लिखित आदेश देण्यात आलेले नाहीत, याचा अर्थ दिल्लीकडे आवश्यकतेनुसार झटपट धोरण बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, “सध्या तरी काहीही प्रगती झालेली नाही.” अलीकडच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यात घनिष्ठ भागीदारी राहिली आहे. परंतु, या टॅरिफनंतर भारताने सांगितले की, त्याला अनुचितरीत्या लक्ष्य केले जात आहे. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका आणि त्याचे युरोपीय सहकारीदेखील स्वतःच्या हितासाठी रशियासोबत व्यापार करत आहेत.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या