Eknath Shinde : "स्वाभिमान गहाण ठेवल्याची शिक्षा; काँग्रेसनेच दाखवली जागा, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला"

मुंबई : दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घडलेला एक प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे काल या महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला दाखल झाले होते. त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते. बैठकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमधील खोट्या मतदारांचा मुद्दा मांडत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. पण या राजकीय चर्चेपेक्षा सोशल मीडियावर एका फोटोनं खळबळ माजवली. त्या फोटोत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे सभागृहाच्या एकदम मागच्या, म्हणजे शेवटच्या रांगेत बसलेले दिसत होते. राजकीय वर्तुळात हा फोटो झळकताच विरोधकांनी लगेचच टोलेबाजी सुरू केली. “दिल्लीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसलेला ठाकरे गट महाराष्ट्रात नेतृत्वाचं स्वप्न कसं बघतो?” अशा प्रकारच्या टिप्पणींनी सोशल मीडियावर वादाचा तडका लावला आहे. आता या “शेवटच्या रांगेच्या” फोटोपासून विरोधकांना नवा हल्ल्याचा मुद्दा मिळाल्याचं स्पष्ट दिसतं. उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याच्या फोटोपासून रंगलेलं राजकारण अजून थांबण्याची चिन्हं नाहीत.


या संपूर्ण प्रकरणावर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलकाट्यांची फटकारणी केली आहे. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे मागच्या रांगेत दिसल्याने विरोधकांनी आधीच चिमटे काढले होते. पण शिंदेंनी तर सरळ “स्वाभिमान” आणि “बाळासाहेबांची विचारधारा” यावरच बोट ठेवलं. पत्रकारांनी या फोटोबद्धल विचारलं असता शिंदे म्हणाले, “जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, त्याग करतात… त्यांना अशा गोष्टींचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची खरी जागा दाखवली असेल.” शिंदेंच्या या विधानात एकीकडे टोमणा, तर दुसरीकडे ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर थेट वार असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. म्हणजेच “शेवटच्या रांगेत बसवणं” हा फक्त फोटोतला योगायोग नव्हे, तर काँग्रेसकडून दिलेला ‘राजकीय संदेश’ असल्याचा सूर शिंदेंच्या भाषणातून दिसला.




तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं? शिंदेंचा टोला


पुढे शिंदे म्हणाले, “ज्यांचा अपमान झाला, अवमान झाला… आणि तरीही त्यांना त्याचं काही वाटत नसेल, तर मी त्यावर काय बोलणार? खरं म्हणजे स्वाभिमान गहाण टाकणारे, बाळासाहेबांचे विचार विकणारे, त्याग करणारे… अशांना या गोष्टीचा त्रास होणारच नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची खरी जागा दाखवली असेल. आणि यावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती त्यांनी द्यावी, मी नाही.” यातच त्यांनी आणखी एक खोचक टीका केली, “उलट तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं.” म्हणजे शिंदेंच्या भाषणात फक्त टोमणेच नव्हते, तर ठाकरेंच्या नेतृत्व आणि स्थानाबद्दल सरळसरळ "तुमचं महत्त्व काँग्रेसनेच ठरवलं" असा संदेश दडलेला होता.




त्यांची जागा काँग्रेसने दाखवली...


“आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. विकासाचाही विचार पुढे नेतोय. म्हणूनच श्रीकांत शिंदे यांना काही देशांच्या दौर्‍यावर जाणाऱ्या डेलिगेशनचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणाचा सन्मान करायचा, कोणाला मान द्यायचा हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत, आणि हा सन्मान त्या विचाराचा आहे.” “ज्यांचा अवमान झाला, अपमान झाला, आणि तरीही ज्यांना त्याचं काही वाटत नाही, अशांबद्दल मी काय बोलणार? तुम्हीच त्यांना विचारायला हवं. ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, ज्यांनी विचार सोडले, त्यांचं असंच होतं. त्यांची जागा काँग्रेसने दाखवली आहे. म्हणूनच अनेक लोक म्हणतात विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात.”

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण