वाळत घातलेले कपडे काढताना लागला विजेचा धक्का, महिलेचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये घडली.


भावना राकेश जाधव (७१) असं मृत महिलेचं नाव असून याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. भावना जाधव या महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून, मुलगा व्यावसायिक आहे. बुधवारी पती आणि मुलगा बाहेर गेलेले होते. त्या सून व मुलीसह घरी होत्या. त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या गॅलरीत तारेवर कपडे वाळत घातलेले होते.


दुपारी कपडे वाळल्यानंतर ते काढण्यासाठी गेल्या. तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून त्या खाली कोसळल्या. काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने मुलगी आणि सून यांनी गॅलरीकडे धाव घेतली. त्यांना भावना कोसळलेल्या दिसताच त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत भावना जाधव यांना जीएमसीत दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय