वाळत घातलेले कपडे काढताना लागला विजेचा धक्का, महिलेचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये घडली.


भावना राकेश जाधव (७१) असं मृत महिलेचं नाव असून याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. भावना जाधव या महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून, मुलगा व्यावसायिक आहे. बुधवारी पती आणि मुलगा बाहेर गेलेले होते. त्या सून व मुलीसह घरी होत्या. त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या गॅलरीत तारेवर कपडे वाळत घातलेले होते.


दुपारी कपडे वाळल्यानंतर ते काढण्यासाठी गेल्या. तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून त्या खाली कोसळल्या. काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने मुलगी आणि सून यांनी गॅलरीकडे धाव घेतली. त्यांना भावना कोसळलेल्या दिसताच त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत भावना जाधव यांना जीएमसीत दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा