वाळत घातलेले कपडे काढताना लागला विजेचा धक्का, महिलेचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये घडली.


भावना राकेश जाधव (७१) असं मृत महिलेचं नाव असून याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. भावना जाधव या महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून, मुलगा व्यावसायिक आहे. बुधवारी पती आणि मुलगा बाहेर गेलेले होते. त्या सून व मुलीसह घरी होत्या. त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या गॅलरीत तारेवर कपडे वाळत घातलेले होते.


दुपारी कपडे वाळल्यानंतर ते काढण्यासाठी गेल्या. तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून त्या खाली कोसळल्या. काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने मुलगी आणि सून यांनी गॅलरीकडे धाव घेतली. त्यांना भावना कोसळलेल्या दिसताच त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत भावना जाधव यांना जीएमसीत दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०