वाळत घातलेले कपडे काढताना लागला विजेचा धक्का, महिलेचा दुर्देवी मृत्यू

  30

जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये घडली.


भावना राकेश जाधव (७१) असं मृत महिलेचं नाव असून याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. भावना जाधव या महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून, मुलगा व्यावसायिक आहे. बुधवारी पती आणि मुलगा बाहेर गेलेले होते. त्या सून व मुलीसह घरी होत्या. त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या गॅलरीत तारेवर कपडे वाळत घातलेले होते.


दुपारी कपडे वाळल्यानंतर ते काढण्यासाठी गेल्या. तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून त्या खाली कोसळल्या. काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने मुलगी आणि सून यांनी गॅलरीकडे धाव घेतली. त्यांना भावना कोसळलेल्या दिसताच त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत भावना जाधव यांना जीएमसीत दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Comments
Add Comment

काम करा, अन्यथा फेरबदल होणार : शिंदेंचा मंत्र्यांना इशारा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो, महिला आयोगाचा धक्कादायक खुलासा

पुणे : पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे

अवयवदानात महाराष्ट्र देशात अव्वल!

मुंबई : अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या वर्षी राज्यात १९८ ब्रेन-डेड दात्यांची नोंदणी

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार जुलैचा हप्ता

मुंबई : राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून १५०० रुपये बँक खात्यात

पुण्यात बोर्ड काढण्यावरून वाद , तरुणावर कोयत्याने वार; काँग्रेसच्या माजी नेत्यावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . कधी खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार , तर कधी कोयता गँग

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार