सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी चौकशी समितीच्या अहवालाला आणि तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने ३० जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता, जो अखेर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात आला.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. खंडपीठाने म्हटले की, "जर तुम्हाला वाटत असेल की ही प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, तर तुम्ही चौकशीत का भाग घेतला? तुम्ही त्याला ताबडतोब आव्हान देऊ शकला नसता का? तुमच्या कृतीवरून असे दिसते की तुम्ही वाट पाहिली." न्यायालयाने असेही म्हटले की, मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय हे केवळ पोस्ट ऑफिस नाही. असे आरोप झाल्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना माहिती देणे ही मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी आहे.

मार्च २०२५ मध्ये, न्यायाधीश यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना, त्यांच्या सरकारी निवासस्थानाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात अर्धवट जळालेले पैसे सापडले होते. तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तीन न्यायाधीशांची एक अंतर्गत समिती स्थापन केली होती. यात न्यायाधीश शील नागू, न्यायमूर्ती जीएस संधावाल्या आणि न्यायमूर्ती अनु शिवरामन होते. समितीने ५५ साक्षीदारांचे जबाब आणि व्हिडिओ-फोटो पुराव्यांच्या आधारे असा निष्कर्ष काढला की न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला या रोख रकमेची माहिती होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, जो त्यांनी नाकारला. यानंतर, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना शिफारस पाठवण्यात आली, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनीही महाभियोगाच्या सूचना पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देण्यासाठी न्यायमूर्ती यशवंत वर्मा सर्वोच्च न्यायालयात गेले. वर्मा यांनी अंतर्गत प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेवरही प्रश्न उपस्थित केले. पण सर्वोच्च न्यायालयाने वर्मांबाबत तत्कालीन मुख्य न्यायाधीशांचा निर्णय वैध ठरवला.
Comments
Add Comment

Mathura Accident : मथुरेत भीषण दुर्घटना! भाकिकांनी भरलेली बोट यमुनेत बोट बुडाली; ९ भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस

Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे