सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी चौकशी समितीच्या अहवालाला आणि तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने ३० जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता, जो अखेर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात आला.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. खंडपीठाने म्हटले की, "जर तुम्हाला वाटत असेल की ही प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, तर तुम्ही चौकशीत का भाग घेतला? तुम्ही त्याला ताबडतोब आव्हान देऊ शकला नसता का? तुमच्या कृतीवरून असे दिसते की तुम्ही वाट पाहिली." न्यायालयाने असेही म्हटले की, मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय हे केवळ पोस्ट ऑफिस नाही. असे आरोप झाल्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना माहिती देणे ही मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी आहे.

मार्च २०२५ मध्ये, न्यायाधीश यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना, त्यांच्या सरकारी निवासस्थानाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात अर्धवट जळालेले पैसे सापडले होते. तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तीन न्यायाधीशांची एक अंतर्गत समिती स्थापन केली होती. यात न्यायाधीश शील नागू, न्यायमूर्ती जीएस संधावाल्या आणि न्यायमूर्ती अनु शिवरामन होते. समितीने ५५ साक्षीदारांचे जबाब आणि व्हिडिओ-फोटो पुराव्यांच्या आधारे असा निष्कर्ष काढला की न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला या रोख रकमेची माहिती होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, जो त्यांनी नाकारला. यानंतर, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना शिफारस पाठवण्यात आली, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनीही महाभियोगाच्या सूचना पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देण्यासाठी न्यायमूर्ती यशवंत वर्मा सर्वोच्च न्यायालयात गेले. वर्मा यांनी अंतर्गत प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेवरही प्रश्न उपस्थित केले. पण सर्वोच्च न्यायालयाने वर्मांबाबत तत्कालीन मुख्य न्यायाधीशांचा निर्णय वैध ठरवला.
Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली