सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी चौकशी समितीच्या अहवालाला आणि तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने ३० जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता, जो अखेर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात आला.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. खंडपीठाने म्हटले की, "जर तुम्हाला वाटत असेल की ही प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, तर तुम्ही चौकशीत का भाग घेतला? तुम्ही त्याला ताबडतोब आव्हान देऊ शकला नसता का? तुमच्या कृतीवरून असे दिसते की तुम्ही वाट पाहिली." न्यायालयाने असेही म्हटले की, मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय हे केवळ पोस्ट ऑफिस नाही. असे आरोप झाल्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना माहिती देणे ही मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी आहे.

मार्च २०२५ मध्ये, न्यायाधीश यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना, त्यांच्या सरकारी निवासस्थानाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात अर्धवट जळालेले पैसे सापडले होते. तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तीन न्यायाधीशांची एक अंतर्गत समिती स्थापन केली होती. यात न्यायाधीश शील नागू, न्यायमूर्ती जीएस संधावाल्या आणि न्यायमूर्ती अनु शिवरामन होते. समितीने ५५ साक्षीदारांचे जबाब आणि व्हिडिओ-फोटो पुराव्यांच्या आधारे असा निष्कर्ष काढला की न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला या रोख रकमेची माहिती होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, जो त्यांनी नाकारला. यानंतर, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना शिफारस पाठवण्यात आली, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनीही महाभियोगाच्या सूचना पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देण्यासाठी न्यायमूर्ती यशवंत वर्मा सर्वोच्च न्यायालयात गेले. वर्मा यांनी अंतर्गत प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेवरही प्रश्न उपस्थित केले. पण सर्वोच्च न्यायालयाने वर्मांबाबत तत्कालीन मुख्य न्यायाधीशांचा निर्णय वैध ठरवला.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने