Jammu And Kashmir : उधमपूरमध्ये शोकांतिका; CRPFचे वाहन खोल दरीत कोसळले, दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चे जवान घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने २ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १२ जवान गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं आणि सर्व जखमी जवानांना उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक प्रशासन व सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण सुरक्षा दलामध्ये शोककळा पसरली असून, अपघाताबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनाने १८ जवानांना घेऊन कडवा येथून बसंतगडकडे कूच केली होती. मात्र सकाळी सुमारे १०:३० वाजता ट्रकचा ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले. या हृदयद्रावक घटनेत दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच उधमपूरचे स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.





स्थानिकांनी दाखवली माणुसकी


उधमपूरमधील सीआरपीएफ वाहनाच्या भीषण अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी माणुसकीचं दर्शन घडवत तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. दुर्घटनेनंतर बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आलं असून, घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमी जवानांना बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं, “सीआरपीएफ वाहनाच्या अपघाताची बातमी ऐकून मला अत्यंत दु:ख झालं आहे. या वाहनात आपले अनेक शूर जवान होते. बचावकार्य वेगाने सुरू असून स्थानिक लोकांनीही स्वतःहून पुढे येत मदतीचा हात दिला आहे. सर्वतोपरी मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” या मानवी भावनेच्या प्रत्ययामुळे संकटाच्या प्रसंगी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं उदाहरण दिसून आलं आहे.



उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची शोकभावना




जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफच्या ट्रकला भीषण अपघात होऊन दोन जवानांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. यावर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टद्वारे त्यांनी लिहिलं की, “सीआरपीएफच्या जवानांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. देशासाठी त्यांनी दिलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.” या दुर्घटनेबद्दल देशभरातून सहवेदना व्यक्त होत असून जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत पुरवली जात आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला