Jammu And Kashmir : उधमपूरमध्ये शोकांतिका; CRPFचे वाहन खोल दरीत कोसळले, दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चे जवान घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने २ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १२ जवान गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं आणि सर्व जखमी जवानांना उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक प्रशासन व सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण सुरक्षा दलामध्ये शोककळा पसरली असून, अपघाताबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनाने १८ जवानांना घेऊन कडवा येथून बसंतगडकडे कूच केली होती. मात्र सकाळी सुमारे १०:३० वाजता ट्रकचा ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले. या हृदयद्रावक घटनेत दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच उधमपूरचे स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.





स्थानिकांनी दाखवली माणुसकी


उधमपूरमधील सीआरपीएफ वाहनाच्या भीषण अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी माणुसकीचं दर्शन घडवत तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. दुर्घटनेनंतर बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आलं असून, घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमी जवानांना बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं, “सीआरपीएफ वाहनाच्या अपघाताची बातमी ऐकून मला अत्यंत दु:ख झालं आहे. या वाहनात आपले अनेक शूर जवान होते. बचावकार्य वेगाने सुरू असून स्थानिक लोकांनीही स्वतःहून पुढे येत मदतीचा हात दिला आहे. सर्वतोपरी मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” या मानवी भावनेच्या प्रत्ययामुळे संकटाच्या प्रसंगी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं उदाहरण दिसून आलं आहे.



उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची शोकभावना




जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफच्या ट्रकला भीषण अपघात होऊन दोन जवानांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. यावर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टद्वारे त्यांनी लिहिलं की, “सीआरपीएफच्या जवानांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. देशासाठी त्यांनी दिलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.” या दुर्घटनेबद्दल देशभरातून सहवेदना व्यक्त होत असून जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत पुरवली जात आहे.

Comments
Add Comment

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील ३२ वर्षांच्या मोहम्मद निजामुद्दीनचा अमेरिकेत स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक