अमेरिकेचा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक, ट्रम्प यांच्या आदेशानंतर भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय अनुचित, अन्यायकारक आणि अवैध असल्याचे परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल यांनी म्हंटले आहे.


यासंदर्भात जयस्वाल म्हणाले की, अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. जगातील इतर देशही त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. भारत आपल्या राष्ट्रीय हितांची संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार आहे. त्यांनी असेही नमूद केले की भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केलेले नाही आणि जागतिक व्यापाराच्या सर्व मानकांचे काटेकोर पालन केले आहे. यासोबतच भारताने स्पष्ट केले की, ऊर्जा सुरक्षेसाठी भारत यापुढेही विविध स्रोतांमधून पुरवठा सुनिश्चित करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ट्रम्प यांनी 30 जुलै रोजी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘सोशल ट्रूथ’ वर जाहीर केला होता. त्यांनी त्यावेळी लिहिले होते की, ‘लक्षात ठेवा, भारत आपला मित्र आहे, पण गेल्या काही वर्षांत आपण त्याच्याशी तुलनेत कमी व्यापार केला आहे कारण त्यांच्या टॅरिफ खूप जास्त आहेत. जगातील सर्वांत जास्त आहेत आणि कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात व्यापारासाठी सर्वाधिक कठीण अडथळे आहेत. शिवाय, त्यांनी आपले बहुतेक सैन्य सामग्री रशियाकडून खरेदी केली आहे आणि चीनसह ते रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार आहेत, तेही अशा काळात जेव्हा रशियाने युक्रेनसोबत युद्ध थांबवावे ही सर्वाची इच्छा असल्याचे ट्रंप म्हणाले होते.


त्यानंतर 6 ऑगस्टला ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर सही केली. त्यानंतरही भारताने आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, हा टॅरिफ तत्काळ लागू होणार नाही; हा अतिरिक्त टॅरिफ 21 दिवसांनंतर म्हणजे 27 ऑगस्टपासून लागू होईल. अमेरिकेने हा टॅरिफ भारतावर रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी केल्यामुळे लावला आहे. मात्र भारताने यावर आपली ऊर्जा सुरक्षा बाजू मांडली आहे. हा निर्णय अमेरिकेच्या धोरणात्मक हितांसाठी घेतल्याचा अंदाज आहे, जो भारत-रशिया ऊर्जा संबंधांशी संबंधित आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर