अमेरिकेचा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक, ट्रम्प यांच्या आदेशानंतर भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय अनुचित, अन्यायकारक आणि अवैध असल्याचे परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल यांनी म्हंटले आहे.


यासंदर्भात जयस्वाल म्हणाले की, अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. जगातील इतर देशही त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. भारत आपल्या राष्ट्रीय हितांची संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार आहे. त्यांनी असेही नमूद केले की भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केलेले नाही आणि जागतिक व्यापाराच्या सर्व मानकांचे काटेकोर पालन केले आहे. यासोबतच भारताने स्पष्ट केले की, ऊर्जा सुरक्षेसाठी भारत यापुढेही विविध स्रोतांमधून पुरवठा सुनिश्चित करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ट्रम्प यांनी 30 जुलै रोजी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘सोशल ट्रूथ’ वर जाहीर केला होता. त्यांनी त्यावेळी लिहिले होते की, ‘लक्षात ठेवा, भारत आपला मित्र आहे, पण गेल्या काही वर्षांत आपण त्याच्याशी तुलनेत कमी व्यापार केला आहे कारण त्यांच्या टॅरिफ खूप जास्त आहेत. जगातील सर्वांत जास्त आहेत आणि कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात व्यापारासाठी सर्वाधिक कठीण अडथळे आहेत. शिवाय, त्यांनी आपले बहुतेक सैन्य सामग्री रशियाकडून खरेदी केली आहे आणि चीनसह ते रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार आहेत, तेही अशा काळात जेव्हा रशियाने युक्रेनसोबत युद्ध थांबवावे ही सर्वाची इच्छा असल्याचे ट्रंप म्हणाले होते.


त्यानंतर 6 ऑगस्टला ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर सही केली. त्यानंतरही भारताने आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, हा टॅरिफ तत्काळ लागू होणार नाही; हा अतिरिक्त टॅरिफ 21 दिवसांनंतर म्हणजे 27 ऑगस्टपासून लागू होईल. अमेरिकेने हा टॅरिफ भारतावर रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी केल्यामुळे लावला आहे. मात्र भारताने यावर आपली ऊर्जा सुरक्षा बाजू मांडली आहे. हा निर्णय अमेरिकेच्या धोरणात्मक हितांसाठी घेतल्याचा अंदाज आहे, जो भारत-रशिया ऊर्जा संबंधांशी संबंधित आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,