अमेरिकेचा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक, ट्रम्प यांच्या आदेशानंतर भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय अनुचित, अन्यायकारक आणि अवैध असल्याचे परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल यांनी म्हंटले आहे.


यासंदर्भात जयस्वाल म्हणाले की, अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. जगातील इतर देशही त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. भारत आपल्या राष्ट्रीय हितांची संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार आहे. त्यांनी असेही नमूद केले की भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केलेले नाही आणि जागतिक व्यापाराच्या सर्व मानकांचे काटेकोर पालन केले आहे. यासोबतच भारताने स्पष्ट केले की, ऊर्जा सुरक्षेसाठी भारत यापुढेही विविध स्रोतांमधून पुरवठा सुनिश्चित करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ट्रम्प यांनी 30 जुलै रोजी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘सोशल ट्रूथ’ वर जाहीर केला होता. त्यांनी त्यावेळी लिहिले होते की, ‘लक्षात ठेवा, भारत आपला मित्र आहे, पण गेल्या काही वर्षांत आपण त्याच्याशी तुलनेत कमी व्यापार केला आहे कारण त्यांच्या टॅरिफ खूप जास्त आहेत. जगातील सर्वांत जास्त आहेत आणि कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात व्यापारासाठी सर्वाधिक कठीण अडथळे आहेत. शिवाय, त्यांनी आपले बहुतेक सैन्य सामग्री रशियाकडून खरेदी केली आहे आणि चीनसह ते रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार आहेत, तेही अशा काळात जेव्हा रशियाने युक्रेनसोबत युद्ध थांबवावे ही सर्वाची इच्छा असल्याचे ट्रंप म्हणाले होते.


त्यानंतर 6 ऑगस्टला ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर सही केली. त्यानंतरही भारताने आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, हा टॅरिफ तत्काळ लागू होणार नाही; हा अतिरिक्त टॅरिफ 21 दिवसांनंतर म्हणजे 27 ऑगस्टपासून लागू होईल. अमेरिकेने हा टॅरिफ भारतावर रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी केल्यामुळे लावला आहे. मात्र भारताने यावर आपली ऊर्जा सुरक्षा बाजू मांडली आहे. हा निर्णय अमेरिकेच्या धोरणात्मक हितांसाठी घेतल्याचा अंदाज आहे, जो भारत-रशिया ऊर्जा संबंधांशी संबंधित आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा