भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने


नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले. आता टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-२ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.


भारत उर्वरित वर्षातील सर्व कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. भारत आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. भारत ऑक्टोबर महिन्यात विंडीजविरुद्ध २ ते १४ ऑक्टोबरदरम्यान २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर शुभमनसेना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये २ मॅचची टेस्ट सीरिज खेळणार आहे. विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे तर दुसरा सामना १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे होणार आहे.


तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबरला कोलकाता आणि दुसरा सामना २२ ते २६ नोव्हेंबरला गुवाहाटी येथे पार पडणार आहे.


दरम्यान, शुभमन गिल याच्या नेतृत्वातील पहिली कसोटी मालिका भारताने बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत राखली.


टीम इंडिया पाचव्या सामन्याआधी या मालिकेत १-२ ने पिछाडीवर होती. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना हा प्रतिष्ठेचा होता. भारतासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान होते. टीम इंडियाने हा सामना जवळपास गमावलाच होता. मात्र टीम इंडियाने ऐन क्षणी सामन्यात कमबॅक केलं आणि इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र