भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने


नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले. आता टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-२ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.


भारत उर्वरित वर्षातील सर्व कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. भारत आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. भारत ऑक्टोबर महिन्यात विंडीजविरुद्ध २ ते १४ ऑक्टोबरदरम्यान २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर शुभमनसेना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये २ मॅचची टेस्ट सीरिज खेळणार आहे. विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे तर दुसरा सामना १० ते १४ ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे होणार आहे.


तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबरला कोलकाता आणि दुसरा सामना २२ ते २६ नोव्हेंबरला गुवाहाटी येथे पार पडणार आहे.


दरम्यान, शुभमन गिल याच्या नेतृत्वातील पहिली कसोटी मालिका भारताने बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत राखली.


टीम इंडिया पाचव्या सामन्याआधी या मालिकेत १-२ ने पिछाडीवर होती. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना हा प्रतिष्ठेचा होता. भारतासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान होते. टीम इंडियाने हा सामना जवळपास गमावलाच होता. मात्र टीम इंडियाने ऐन क्षणी सामन्यात कमबॅक केलं आणि इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.

Comments
Add Comment

Ebola virus : युगांडामधून बंगळुरूमध्ये आलेल्या महिलेत आढळली 'इबोला व्हायरस'ची लक्षणे ; रक्ताचे नमुने पाठवले पुण्यात !

इबोला व्हायरस २०२६ : युगांडा आणि काँगोसह अनेक आफ्रिकन देशात इबोला संसर्गाची (Ebola Virus) प्रसारण सातत्याने वाढताना

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला