Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३० वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण बोगी जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



स्थानकावर मागील काही महिन्यांपासून तीन बोगी उभ्या होत्या. त्यापैकी एका बोगीतून अचानक आगीचे लोट आणि धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वाढत गेल्याने नगरपालिका अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, एका बंबातील पाणी संपल्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्याने दुसऱ्या बंबाची मदत घेण्यात आली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर शेवटी ही आग नियंत्रणात आली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे प्रशासनाने याबाबत चौकशी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे