उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरातच उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यात उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि ईशान्य मुंबईतील काही लोकसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आहेत.


जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या अनेक आमदारांनी आणि खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतही अशीच परिस्थिती दिसून आली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत अनेक माजी नगरसेवकांनी उबाठा शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाला पाठिंबा दिला.


२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अपक्ष, मनसेचे सहा आणि जात पडताळती अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या जागी निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे ही संख्या महापालिका विसर्जित होई पर्यंत १०२ वर पोहोचली होती. त्यातील दोन माजी नगरसेवक मृत पावल्याने ही संख्या १०० एवढी झाली होती. त्यातील आजमितीस ४८ ते ४९ उबाठाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोनच दिवसांपूर्वी शीव प्रतीक्षानगरमधील उबाठाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कांबळे हे निष्ठावान शिवसैनिक मानले जात होते आणि कोणत्याही परिस्थितीत ते उबाठा शिवसेना सोडणार नाही अशी खात्री पक्षाच्या नेत्यांना होती. तसेच लोकसभा आणि विधानसभेतही पक्षासाठी त्यांनी झटून काम केले होते. पण कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उबाठाला मोठा धक्का बसला. असेच धक्के येत्या महिन्याभरात उबाठाला बसण्याची शक्यता आहे.


उबाठाकडे सध्या ५१ ते ५२ माजी नगरसेवक असून यातील दहा ते पंधरा माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातील काही नगरसेवक हे भाजपातही जाऊ शकतात,असेही बोलले जाते. मात्र हे सर्व माजी नगरसेवक पक्षासाठी सध्या निष्ठावान म्हणून ओळखले जात असून सध्या ते पक्षात अशाप्रकारे सक्रीय आहेत की त्यांच्या पक्ष सोडण्यानंतर पक्षालाही आणि आसपासच्या पदाधिकारी आणि नेत्यांना धक्का बसू शकतो असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना पक्षावर आता विश्वास अधिक दृढ होवू लागला असून त्यामुळे बहुतांशी २०१२ आणि २०२७मधील माजी नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश पक्ष ठरवेल, त्याप्रमाणे करून घेतला जाईल,असेही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे. आता प्रवेश केल्यास त्यांनी सुचवलेल्या विकासकामांना मंजुरी देऊन त्याप्रमाणे कामे करता येतील आणि त्याचे श्रेय त्या संबंधित लोकप्रतिनिधीला मिळेल. मागील तीन ते साडेतीन वर्षांमध्ये नगरसेवकांनी पाच वर्षांत केलेली कामे शुन्य झाल्याने आता त्यांना सत्ताधारी पक्षासोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील प्रवेशाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल,असेही बोलले जाते.

Comments
Add Comment

BMC News : उबाठा,काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात कोटींचा निधी

- निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप, पण भाजपने राखला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचाही मान मुंबई (सचिन धानजी) मुंबई

Online LPG bookings : ऑनलाइन एलपीजी बुकिंंगमध्ये ९८ टक्क्यांनी वाढ; शासनाच्या कडक कारवाईमुळे ग्राहकांच्या विश्वासात वाढ

मुंबई : एलपीजी उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत. इंधन टंचाईची भीती आणि

BKC Metro Accident : मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना क्रेनचा अचानक तोल गेल्याने अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीवर परिणाम

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात म्हणजेच बीकेसी परिसरात आज सकाळी (बुधवार, १५ एप्रिल) सकाळी

Maharashtra : महाराष्ट्रात पाईप गॅसची सुविधा घरोघरी पोहोचवण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न जोरात

मुंबई : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने

SOP For Heat wave : उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून एसओपी जारी

मुंबई : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या

Ashok Kharat, Rupali Chakankar : खरात प्रकरणात माझ्या बदनामीचा डाव - रुपाली चाकणकर

मुंबई : "गेल्या २८ दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होणारे सर्व आरोप हे केवळ हेतूपुरस्सर आणि बदनामी