उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरातच उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यात उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि ईशान्य मुंबईतील काही लोकसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आहेत.


जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या अनेक आमदारांनी आणि खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतही अशीच परिस्थिती दिसून आली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत अनेक माजी नगरसेवकांनी उबाठा शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाला पाठिंबा दिला.


२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अपक्ष, मनसेचे सहा आणि जात पडताळती अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या जागी निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे ही संख्या महापालिका विसर्जित होई पर्यंत १०२ वर पोहोचली होती. त्यातील दोन माजी नगरसेवक मृत पावल्याने ही संख्या १०० एवढी झाली होती. त्यातील आजमितीस ४८ ते ४९ उबाठाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोनच दिवसांपूर्वी शीव प्रतीक्षानगरमधील उबाठाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कांबळे हे निष्ठावान शिवसैनिक मानले जात होते आणि कोणत्याही परिस्थितीत ते उबाठा शिवसेना सोडणार नाही अशी खात्री पक्षाच्या नेत्यांना होती. तसेच लोकसभा आणि विधानसभेतही पक्षासाठी त्यांनी झटून काम केले होते. पण कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उबाठाला मोठा धक्का बसला. असेच धक्के येत्या महिन्याभरात उबाठाला बसण्याची शक्यता आहे.


उबाठाकडे सध्या ५१ ते ५२ माजी नगरसेवक असून यातील दहा ते पंधरा माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातील काही नगरसेवक हे भाजपातही जाऊ शकतात,असेही बोलले जाते. मात्र हे सर्व माजी नगरसेवक पक्षासाठी सध्या निष्ठावान म्हणून ओळखले जात असून सध्या ते पक्षात अशाप्रकारे सक्रीय आहेत की त्यांच्या पक्ष सोडण्यानंतर पक्षालाही आणि आसपासच्या पदाधिकारी आणि नेत्यांना धक्का बसू शकतो असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना पक्षावर आता विश्वास अधिक दृढ होवू लागला असून त्यामुळे बहुतांशी २०१२ आणि २०२७मधील माजी नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश पक्ष ठरवेल, त्याप्रमाणे करून घेतला जाईल,असेही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे. आता प्रवेश केल्यास त्यांनी सुचवलेल्या विकासकामांना मंजुरी देऊन त्याप्रमाणे कामे करता येतील आणि त्याचे श्रेय त्या संबंधित लोकप्रतिनिधीला मिळेल. मागील तीन ते साडेतीन वर्षांमध्ये नगरसेवकांनी पाच वर्षांत केलेली कामे शुन्य झाल्याने आता त्यांना सत्ताधारी पक्षासोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील प्रवेशाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल,असेही बोलले जाते.

Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य