उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरातच उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यात उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि ईशान्य मुंबईतील काही लोकसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आहेत.


जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या अनेक आमदारांनी आणि खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतही अशीच परिस्थिती दिसून आली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत अनेक माजी नगरसेवकांनी उबाठा शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाला पाठिंबा दिला.


२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अपक्ष, मनसेचे सहा आणि जात पडताळती अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या जागी निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे ही संख्या महापालिका विसर्जित होई पर्यंत १०२ वर पोहोचली होती. त्यातील दोन माजी नगरसेवक मृत पावल्याने ही संख्या १०० एवढी झाली होती. त्यातील आजमितीस ४८ ते ४९ उबाठाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोनच दिवसांपूर्वी शीव प्रतीक्षानगरमधील उबाठाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कांबळे हे निष्ठावान शिवसैनिक मानले जात होते आणि कोणत्याही परिस्थितीत ते उबाठा शिवसेना सोडणार नाही अशी खात्री पक्षाच्या नेत्यांना होती. तसेच लोकसभा आणि विधानसभेतही पक्षासाठी त्यांनी झटून काम केले होते. पण कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उबाठाला मोठा धक्का बसला. असेच धक्के येत्या महिन्याभरात उबाठाला बसण्याची शक्यता आहे.


उबाठाकडे सध्या ५१ ते ५२ माजी नगरसेवक असून यातील दहा ते पंधरा माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातील काही नगरसेवक हे भाजपातही जाऊ शकतात,असेही बोलले जाते. मात्र हे सर्व माजी नगरसेवक पक्षासाठी सध्या निष्ठावान म्हणून ओळखले जात असून सध्या ते पक्षात अशाप्रकारे सक्रीय आहेत की त्यांच्या पक्ष सोडण्यानंतर पक्षालाही आणि आसपासच्या पदाधिकारी आणि नेत्यांना धक्का बसू शकतो असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना पक्षावर आता विश्वास अधिक दृढ होवू लागला असून त्यामुळे बहुतांशी २०१२ आणि २०२७मधील माजी नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश पक्ष ठरवेल, त्याप्रमाणे करून घेतला जाईल,असेही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे. आता प्रवेश केल्यास त्यांनी सुचवलेल्या विकासकामांना मंजुरी देऊन त्याप्रमाणे कामे करता येतील आणि त्याचे श्रेय त्या संबंधित लोकप्रतिनिधीला मिळेल. मागील तीन ते साडेतीन वर्षांमध्ये नगरसेवकांनी पाच वर्षांत केलेली कामे शुन्य झाल्याने आता त्यांना सत्ताधारी पक्षासोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील प्रवेशाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल,असेही बोलले जाते.

Comments
Add Comment

Mangesh Desai : आता 'धर्मवीर ३' नाही, तर 'गुवाहाटी फाइल्स'? निर्माते मंगेश देसाईंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; म्हणाले...

मुंबई : दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):