खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष


मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी


सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे च्या माध्यमातून या वर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी रो - रो कार सेवेची सुरुवात केली जात आहे. मात्र आनंदाची बातमी अशी की, या रो - रो कार सेवेला कोलाड (रायगड) व वेर्णा (गोवा) हे थांबे निश्चित केले होते. परंतु आता मात्र या रो - रो सेवेला कणकवली तालुक्यातील नांदगाव रेलचे स्थानकात देखील थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.


मुंबईतून रेल्वेतून कार घेऊन आलेल्या चाकरमान्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात नांदगाव येथे कार उतरता येणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती.


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे देखील या प्रश्नी समितीने लक्ष वेधले होते. कोकण रेल्वेची रो - रो कार सेवा कोलाड येथून दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर नांदगाव येथे रात्री १० वाजता ही रो रो कार थांबेल. तर नांदगाव येथून रात्री १२ वा. च्या सुमारास ही रो रो गोव्याच्या दिशेने प्रस्थान करणार असून वेर्णा येथे पहाटे ६ वाजता पोचणार आहे. परतीची रो - रो कार सेवा वेर्णा येथून दुपारी ३ वाजता निघेल. नांदगाव येथे ही रो रो कार गाडी रात्री ८ वाजता येईल आणि रात्री १०:३० वाजता मार्गस्थ होऊन कोलाड येथे पहाटे ६ वाजता पोचणार आहे.


रो - रो सेवेला सिंधुदुर्गात थांबा नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. या नाराजीची दखल घेत कोकण रेल्वेने नांदगाव स्थानकातही रो - रो सेवेला थांबा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाहनधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत