खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष


मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी


सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे च्या माध्यमातून या वर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी रो - रो कार सेवेची सुरुवात केली जात आहे. मात्र आनंदाची बातमी अशी की, या रो - रो कार सेवेला कोलाड (रायगड) व वेर्णा (गोवा) हे थांबे निश्चित केले होते. परंतु आता मात्र या रो - रो सेवेला कणकवली तालुक्यातील नांदगाव रेलचे स्थानकात देखील थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.


मुंबईतून रेल्वेतून कार घेऊन आलेल्या चाकरमान्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात नांदगाव येथे कार उतरता येणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती.


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे देखील या प्रश्नी समितीने लक्ष वेधले होते. कोकण रेल्वेची रो - रो कार सेवा कोलाड येथून दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर नांदगाव येथे रात्री १० वाजता ही रो रो कार थांबेल. तर नांदगाव येथून रात्री १२ वा. च्या सुमारास ही रो रो गोव्याच्या दिशेने प्रस्थान करणार असून वेर्णा येथे पहाटे ६ वाजता पोचणार आहे. परतीची रो - रो कार सेवा वेर्णा येथून दुपारी ३ वाजता निघेल. नांदगाव येथे ही रो रो कार गाडी रात्री ८ वाजता येईल आणि रात्री १०:३० वाजता मार्गस्थ होऊन कोलाड येथे पहाटे ६ वाजता पोचणार आहे.


रो - रो सेवेला सिंधुदुर्गात थांबा नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. या नाराजीची दखल घेत कोकण रेल्वेने नांदगाव स्थानकातही रो - रो सेवेला थांबा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाहनधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये