शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

दत्तात्रय भरणेंनी हाती घेतला कृषीमंत्री पदाचा पदभार


मुंबई: शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कृषिमंत्री भरणे यांनी आजपासून मंत्रालयातून कामकाजास सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते.


विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळत असलेल्या व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची  कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करत दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. आज दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. आज मी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे खातं मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मी घेणार आहे, असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे.



"मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा"


कृषिमंत्री भरणे म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा विकासासाठी निर्णय घेण्यात येतील. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

सोन्याच्या अस्थिरतेचा फायदा गुंतवणूकीत परताव्यासह घ्यायचाय? मग 'यासाठी' द वेल्थ कंपनीचा गोल्ड ईटीएफ बाजारात लाँच

एनएफओ अंतिम मुदत २२ डिसेंबरला मोहित सोमण: सध्याच्या जागतिक अस्थिरतेत सोन्यातील 'लेवरेज' घेण्यासाठी द वेल्थ

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

मुंबईत राष्ट्रवादीला वगळून भाजप-शिवसेना-रिपाइंची युती - मंत्री आशिष शेलार, अमित साटम यांची घोषणा; जागा वाटप अंतिम करण्यासाठी दोन दिवसांत पुन्हा बैठक

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी

मोठी बातमी : एचडीएफसी बँकेच्या इंडसइंड बँकतील ९.५% हिस्सा खरेदीसाठी आरबीआयकडून मान्यता

मुंबई: एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या बँकेला आरबीआयने इंडसइंड बँकेत ९.५% इतके भागभांडवल खरेदी करण्यासाठी

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी