Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या अतिवृष्टीमुळे एक नाला ओसंडून वाहू लागला. ज्यांचे पाणी डोंगरावरून अतिशय वेगाने खाली वाहत आले, या पाण्यासोबत भरपूर कचरा असेच गाळ देखील वाहून आल्यामुळे लोकवस्तीची प्रचंड हानी झाली आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे अनेक घरं  वाहून गेली असून, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर अनेकजण ढिगाऱ्यात गाडले गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 


गंगोत्री धाम आणि मुखवा जवळील धारली गावात मंगळवारी अचानक झालेल्या ढगफुटीमुळे  तेथील एक नाला ओसंडून वाहू लागला. या नाल्याचे पाणी डोंगरावरून सखल भागात खूप वेगाने वाहत आले, ज्यामुळे अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे स्थानिक लोक चिंतेत आहेत. नाल्याच्या पाण्यासोबत कचरा आणि गाळदेखील आला आहे, ज्यामध्ये अनेक लोक गाडले जाण्याची भीती आहे. प्रभावित क्षेत्र गंगोत्री धाम जवळ आहे.


ढगफुटीनंतर नाल्यात पाणी भरून वाहू लागल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली होती, आता परिसरात मदत आणि बचाव कार्यालय सुरुवात झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने अपघाताची पुष्टी केली आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले आहे.


मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'धाराली (उत्तरकाशी) परिसरात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित पथके मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.'





लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला


धाराली गावात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. प्रशासनाने सांगितले की हर्षिल परिसरातील खिर गडच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने धाराली शहरात मोठे नुकसान झाले आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ, महसूल, सैन्य आणि आपत्ती पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. प्रशासनाने लोकांना नदीपासून अंतर राखण्याचे आवाहन केले आहे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


ढगफुटीच्या या घटनेनंतर, गंगोत्री धामचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. धारली येथे वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे बाजारपेठ आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस आणि ढगफुटी होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू