Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या अतिवृष्टीमुळे एक नाला ओसंडून वाहू लागला. ज्यांचे पाणी डोंगरावरून अतिशय वेगाने खाली वाहत आले, या पाण्यासोबत भरपूर कचरा असेच गाळ देखील वाहून आल्यामुळे लोकवस्तीची प्रचंड हानी झाली आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे अनेक घरं  वाहून गेली असून, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर अनेकजण ढिगाऱ्यात गाडले गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 


गंगोत्री धाम आणि मुखवा जवळील धारली गावात मंगळवारी अचानक झालेल्या ढगफुटीमुळे  तेथील एक नाला ओसंडून वाहू लागला. या नाल्याचे पाणी डोंगरावरून सखल भागात खूप वेगाने वाहत आले, ज्यामुळे अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे स्थानिक लोक चिंतेत आहेत. नाल्याच्या पाण्यासोबत कचरा आणि गाळदेखील आला आहे, ज्यामध्ये अनेक लोक गाडले जाण्याची भीती आहे. प्रभावित क्षेत्र गंगोत्री धाम जवळ आहे.


ढगफुटीनंतर नाल्यात पाणी भरून वाहू लागल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली होती, आता परिसरात मदत आणि बचाव कार्यालय सुरुवात झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने अपघाताची पुष्टी केली आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले आहे.


मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'धाराली (उत्तरकाशी) परिसरात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित पथके मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.'





लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला


धाराली गावात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. प्रशासनाने सांगितले की हर्षिल परिसरातील खिर गडच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने धाराली शहरात मोठे नुकसान झाले आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ, महसूल, सैन्य आणि आपत्ती पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. प्रशासनाने लोकांना नदीपासून अंतर राखण्याचे आवाहन केले आहे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


ढगफुटीच्या या घटनेनंतर, गंगोत्री धामचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. धारली येथे वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे बाजारपेठ आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस आणि ढगफुटी होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन