वीस वर्षांनी आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का वाद घालता ? राज ठाकरेंचा सवाल

मुंबई : आम्ही दोघं भाऊ जर वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांशी का वाद घालता ? आता वाद न घालता निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळावा सोमवारी मुंबईतील रंगशारदा येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना उद्धव समर्थकांशी जुळवून घेण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

निवडणुका जाहीर होण्याआधीच सध्याच्या मतदार याद्या तपासून घ्या. जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सोबत घ्या; असे निर्देश राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत बलवान आहे. यावेळी मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता येणार आहे. हे मी फक्त टाळ्या-शिट्ट्या मिळवण्यासाठी बोलत नाहीये. जुन्या-जाणत्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या, पक्षापासून दुरावले आहेत, त्यांना एकत्र करा आणि तयारीला लागा, असंही राज ठाकरे म्हणाल्याचं वृत्त आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर ?

जर आम्ही दोघं भाऊ वीस वर्षांनी एकाच मंचावर येऊ शकतो, तर तुम्हीही आपापसातले वाद बाजूला ठेवा आणि एकोप्यानं काम करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ