कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या १६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे. त्यानंतर कोल्हापुरात सीपीआर समोरील इमारतीमध्ये १८ ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.


पक्षकार, वकिलांपासून ते सर्वसामान्य ते राजकीय नेत्यांनी गेल्या ४२ वर्षांपासून दिलेल्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचची घोषणा करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी गेल्या साडेचार दशकांपासून लढा सुरू आहे. खंडपीठाची पहिली पायरी सर्किट बेंचच्या माध्यमातून झाली आहे.


त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्यांच्या मुंबईमधील चकरा पूर्णतः थांबणार आहेत. दरम्यान, सर्किट बेंचसाठी पहिल्या टप्प्यांमध्ये चार ते पाच न्यायमूर्तींची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चार न्यायमूर्तींचे कामकाज चालण्याची व्यवस्था सीपीआरसमोर कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे.


याशिवाय प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन प्रमुख आणि किमान ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल अशी शक्यता बार असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर शहरात शेंडा पार्कमध्ये खंडपीठासाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे.
खंडपीठासह निवासस्थाने सुद्धा यामध्ये प्रस्तावित आहेत. त्यामुळे जागा अंतिम झाल्यानंतर पुढील चार ते पाच वर्षात खंडपीठाची स्वत:ची वास्तू असणार आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता