झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. शिबू सोरेन यांच्यावर दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात मागील एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून उपचार सुरू होते. तिथेच शिबू सोरेन यांनी अखेरचा श्वास घेतला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत शिबू सोरेन यांनी वडिलांच्या निधनाचे वृत्त एक्स पोस्ट करुन दिले.

शिबू सोरेन यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल केले होते. अनुभवी डॉक्टर शिबू सोरेन यांच्यावर उपचार करत होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी शिबू सोरेन यांनी अखेरचा श्वास घेतला. शिबू सोरेन यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक प्रकट केला. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी फोनवरुन बातचीत केली.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक्स पोस्ट केली त्यात ‘ आदरणीय दिशोम गुरुजी हम सभी को छोड़कर चले गए हैं। आज मैं शून्य हो गया हूं...।’ असा संदेश नमूद आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रक काढून झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सकाळी आठ वाजून ५६ मिनिटांनी निधन झाल्याचे जाहीर केले. किडनीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या सोरेन यांना दीड महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. ते सुमारे एक महिना लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. डॉक्टरांची एक टीम आयसीयूमध्ये सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून होती.

शिबू सोरेन तीन वेळा झाले झारखंडचे मुख्यमंत्री

आदिवासी नेते शिबू सोरेन यांनी ३८ वर्षांहून अधिक काळ झारखंड मुक्ती मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांनी झारखंड राज्यासाठी दीर्घ आंदोलन केले आणि तीनदा झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांनी २ मार्च २००५ रोजी पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे १२ मार्च २००५ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. पहिल्यांदाच ते फक्त १० दिवस मुख्यमंत्री राहू शकले. दुसऱ्यांदा ते २७ ऑगस्ट २००८ रोजी मुख्यमंत्री झाले आणि १९ जानेवारी २००९ पर्यंत या पदावर राहिले. तिसऱ्यांदा त्यांनी ३० डिसेंबर २००९ रोजी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १ जून २०१० पर्यंत राहिले.

शिबू सोरेन आठ वेळा लोकसभेचे खासदार आणि तीन वेळा राज्यसभेचे खासदार

शिबू सोरेन हे आठ वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. ते तीन वेळा राज्यसभेचे खासदारही होते. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले होते. ते झारखंडच्या राजकारणातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व होते आणि देशाच्या राजकारणात त्यांचा प्रभाव होता. झारखंडमध्ये त्यांना दिशाम गुरु (देशाचे गुरु) म्हटले जात असे.

शिबू सोरेन यांचे निधन, तीन दिवसांचा दुखवटा

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे संस्थापक संरक्षक दिशाम गुरु शिबू सोरेन यांच्या निधनानंतर, झारखंड सरकारने तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. हा शोककाळ ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत लागू असेल. या काळात, झारखंड मधील सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकेल आणि कोणताही सरकारी कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच शिबू सोरेन यांच्या सन्मानार्थ झारखंड सरकारने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव