अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

  78

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, आयबी संचालक तपन कुमार डेगा, गृहसचिव गोविंद मोहन उपस्थित होते.


यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. या भेटीचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. पण, राष्ट्रपती भवनाने दुपारी १२.४१ वाजता ट्विटरवर (एक्स) पंतप्रधानांनी आणि संध्याकाळी ६.३७ वाजता अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याचे सांगितले होते.


यासोबतच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत बैठक घेतली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या ६ वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी दिल्लीतील या बैठका झाल्या. बैठकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. देशाच्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या