देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

  81

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा जैन नावाच्या महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना तिचे पतीने अरुण कुमार जैन कार्यालयात असताना घडली.



'देवाला भेटण्यासाठी' उचलले धक्कादायक पाऊल


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा जैन गेल्या काही दिवसांपासून खूप धार्मिक आणि आध्यात्मिक बनल्या होत्या. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये पूजाने स्पष्टपणे लिहिले आहे की, त्या 'देवाला भेटण्यासाठी' स्वतःचा जीव देत आहे. तिने लिहिले आहे की, "देवाच्या जवळ जाण्यासाठी मी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे पाऊल उचलत आहे."



शेजाऱ्यांनीही सांगितली ही माहिती


शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, पूजा जैन गेल्या काही काळापासून ध्यान, पूजा-अर्चा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये जास्त रस घेऊ लागली होती. ती अनेकदा सांसारिक जीवनातून मुक्ती मिळवण्याची आणि देवाच्या चरणी आश्रय घेण्याची इच्छा व्यक्त करत असे.


पोलिसांनी पूजा जैनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणतीही कटकारस्थान किंवा मानसिक आजाराचा संशय आलेला नाही. पूजाने केवळ धार्मिक कारणांमुळे हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये