शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न बोलता राज्याच्या बाहेर का गेले ? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.


२१ जून २०२२ ला विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन विधीमंडळाच्या बाहेर पडले. आपल्या ४० आमदारांना घेऊन ते गुवाहाटी ला गेले त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले . देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं.


उद्धव ठाकरे हे पक्षात पडलेल्या दोन गटांसाठी आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. त्यांनी तयार केलेल्या यंत्रणेमुळे पक्षात दोन गटात अंतर निर्माण झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंना हे समजलं की उद्धव ठाकरे आपला वापर करत आहे . आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापले जात आहेत . हे शिंदेंना सहन झाले नाही .


सगळ्या बाबतीत उद्धव तडजोड करु लागले . एकनाथ शिंदेंकडे जे खातं होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणं सुरू केलं. त्यानंतर शिंदेंनी पक्ष सोडायचा विचार केला . उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते.


विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. जेव्हा एकनाथ शिंदेंच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी उठाव केल्याचं फडणवीस म्हणाले. याच रागातून शिंदे निवडणुकीनंतर ४० आमदारांसह पक्षातून बाहेर पडले.



Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील