शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न बोलता राज्याच्या बाहेर का गेले ? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.


२१ जून २०२२ ला विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन विधीमंडळाच्या बाहेर पडले. आपल्या ४० आमदारांना घेऊन ते गुवाहाटी ला गेले त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले . देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं.


उद्धव ठाकरे हे पक्षात पडलेल्या दोन गटांसाठी आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. त्यांनी तयार केलेल्या यंत्रणेमुळे पक्षात दोन गटात अंतर निर्माण झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंना हे समजलं की उद्धव ठाकरे आपला वापर करत आहे . आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापले जात आहेत . हे शिंदेंना सहन झाले नाही .


सगळ्या बाबतीत उद्धव तडजोड करु लागले . एकनाथ शिंदेंकडे जे खातं होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणं सुरू केलं. त्यानंतर शिंदेंनी पक्ष सोडायचा विचार केला . उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते.


विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. जेव्हा एकनाथ शिंदेंच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी उठाव केल्याचं फडणवीस म्हणाले. याच रागातून शिंदे निवडणुकीनंतर ४० आमदारांसह पक्षातून बाहेर पडले.



Comments
Add Comment

दुबई ते भारत ड्रग्सचे जाळे; बॉलीवूड - राजकारणी यांचे ड्रग्स कनेक्शन

मुंबई : अडीचशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद सलीम सुहेल

अदानी समुह आंध्रप्रदेशात १ लाख कोटींची गुंतवणूक करणार ! करण अदानींचे मोठे वक्तव्य

प्रतिनिधी: अदानी समुह येत्या १० वर्षात १ लाख कोटींची गुंतवणूक आंध्रप्रदेशात करणार आहे असे वक्तव्य उद्योगपती व

अनिल अंबानी यांचा मिडीयावर दिशाभूल करण्याचा आरोप केला ईडीकडून चौकशीस अनिल अंबानी सामोरे जाणार,काय म्हणाले अंबानी? वाचा

मुंबई प्रतिनिधी: अनिल अंबानी यांच्याकडून अंमलबजावणी संचालनालयकडून बजावण्यात आलेल्या नोटीशीला उत्तर देण्यात

IND vs SA 1st Test : बुमराहचा 'डबल धमाका'! दक्षिण आफ्रिकेचे टॉप ३ फलंदाज तंबूत; जसप्रीत बुमराहच्या हाती २ महत्त्वाच्या विकेट्स!

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला सामना

विशेष Explainer: जागतिक अस्थिरता बिहार निवडणूकीने बाजारात न्यूट्रल! 'या' सहा कारणांमुळे अखेरच्या सत्रात शेअर बाजारात वाढीची शक्यता? काय करणे अपेक्षित? वाचा

मोहित सोमण:आज शेअर बाजारात वाढ होण्यासाठी अनेक कारणे वर्तवली जात आहे. भारतीय अस्थिरतेच्या गर्तेतून आता तेजीकडे

Bihar Election Result 2025 : 'टांगा पलटी, घोडं फरार!' प्रशांत किशोर यांचा पहिल्याच निवडणुकीत सपशेल पराभव; आता राजकारण सोडून 'कलटी' मारणार?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे राजकीय प्रयोग जन सुराज पार्टीसाठी (Jan Suraj Party) पहिल्या