शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न बोलता राज्याच्या बाहेर का गेले ? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.


२१ जून २०२२ ला विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन विधीमंडळाच्या बाहेर पडले. आपल्या ४० आमदारांना घेऊन ते गुवाहाटी ला गेले त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले . देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं.


उद्धव ठाकरे हे पक्षात पडलेल्या दोन गटांसाठी आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. त्यांनी तयार केलेल्या यंत्रणेमुळे पक्षात दोन गटात अंतर निर्माण झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंना हे समजलं की उद्धव ठाकरे आपला वापर करत आहे . आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापले जात आहेत . हे शिंदेंना सहन झाले नाही .


सगळ्या बाबतीत उद्धव तडजोड करु लागले . एकनाथ शिंदेंकडे जे खातं होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणं सुरू केलं. त्यानंतर शिंदेंनी पक्ष सोडायचा विचार केला . उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते.


विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं होतं. जेव्हा एकनाथ शिंदेंच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी उठाव केल्याचं फडणवीस म्हणाले. याच रागातून शिंदे निवडणुकीनंतर ४० आमदारांसह पक्षातून बाहेर पडले.



Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

नव्या वर्षात सोन्याचांदीत गुंतवणूक करावी की करू नये ? तज्ज्ञांचे मत काय ?

नवी दिल्ली : नाताळच्या दिवशी २४ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख ३९ हजार २५० रुपये तर २२ कॅरेटच्या

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)